शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

वाळू उचलची मुदत संपत आली तरी निम्म्याहून अधिक गटांना प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाल्यानंतर आता वाळू उचलची मुदत ९ जूनला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाल्यानंतर आता वाळू उचलची मुदत ९ जूनला संपणार असली तरी १३ वाळू गटांना प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे या वाळूगटांसाठी वारंवार फेरनिविदा काढण्यासह त्यांची हातची किंमत २५ टक्क्यांनी कमी करण्यात आली होती, तरीदेखील त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, लिलाव झालेल्या आठ वाळू गटांतून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळालेला आहे.

पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारीला निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ वाळू गटांचा लिलाव झाला.

मात्र, जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यांतील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेरनिविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर २५ टक्के हातची किंमत कमी करून फेरनिविदा काढण्यात आली. मात्र, तरीदेखील या वाळू गटांना प्रतिसाद मिळाला नाही.

मुदत संपण्यास १० दिवस शिल्लक

२० जानेवारीला जिल्ह्यातील वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर केवळ बांभोरी, घाडवेल (ता. चोपडा), आव्हाणी (ता. धरणगाव), नारणे, वैजनाथ, टाकरखेडा, उत्राण १, उत्राण २ या आठ वाळू गटांचे लिलाव झाले. त्यानंतर आता वाळू उचलची मुदत ९ जूनला संपणार असून, यास आता केवळ दहा दिवस शिल्लक असले तरी उर्वरित वाळू गटांना प्रतिसाद मिळालेला नाही. लिलाव झालेल्या आठ वाळू गटांतून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल मिळालेला आहे.