शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
4
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
5
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
6
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
7
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
8
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
9
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
10
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
11
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
12
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
13
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
14
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
15
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
16
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
17
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
18
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जनता दरबारातून ४०० हून अधिक तक्रारी काढल्या निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : उपमहापौर सुनील खडके यांनी महिनाभरापासून राबविलेल्या ‘जनता दरबार’ या उपक्रमाचा गुरुवारी समारोप करण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : उपमहापौर सुनील खडके यांनी महिनाभरापासून राबविलेल्या ‘जनता दरबार’ या उपक्रमाचा गुरुवारी समारोप करण्यात आला. या उपक्रमात ६०० हून अधिक तक्रारी उपमहापौरांकडे मांडण्यात आल्या आहे. त्यापैकी ४११ तक्रारींचा निपटारा केला असल्याचा दावा उपमहापौर सुनील खडके यांनी केला आहे. यामध्ये कचऱ्याची सफाई, गटारीची सफाई, चाऱ्या बुजणे, अतिक्रमण, पेन्शनबाबत तक्रारी होत्या. या उपक्रमातंर्गत सर्वाधिक तक्रारी या शहरातील रस्त्यांबाबत होत्या. मात्र, अमृतनंतरच या रस्त्यांचे काम होणार असल्याचे आश्वासन उपमहापौरांनी दिले आहे.

२१ जानेवारीपासून उपमहापौरांनी दर गुरुवारी ‘जनता दरबार’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेवून त्या सोडविण्यावर भर देण्यात आला होता. गुरुवारी या उपक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह मनपाचे विविध अधिकारी उपस्थित होते. गुरुवारी थंडबस्त्यात असलेली गुंठेवारी, अमृत जलप्रकल्प, मलनिस्सारण – भुमिगत गटारी या महत्वाकांक्षी योजनांना होत असलेला विलंब, आणि योजनांतून वगळल्या गेलेल्या कॉलन्या परिसर, त्याचबरोबर एलएडी पथदीवे बसविण्याचे कामांतील संथ गती आदी प्रश्नांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या.

२३ तक्रारी या जागीच सोडविण्यात आल्या.

चार दरबारात सुमारे ४११ तक्रारी या मार्गी लागल्या आहेत. बहुतांशी तक्रारी या जनता दरबारात उपस्थित विभाग प्रमुखांकडून जागच्या जागीच मार्गी लावण्यात आल्या. जनता दरबारात मागील व नविन अशा एकूण ५८५ तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. त्यातील एकूण ३९८ तक्रारी मार्गी लागल्यात तर उर्वरित १८७ तक्रारी सोडविण्यासाठी संबधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे , अशी माहिती उपमहापौर सुनील खडके यांनी दिली. दरम्यान, रस्त्यांचा प्रश्नावर अनेक नागरिकांनी प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे देखील गाऱ्हाणी मांडत नाराजी व्यक्त केली.