शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबारातून ४०० हून अधिक तक्रारी काढल्या निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : उपमहापौर सुनील खडके यांनी महिनाभरापासून राबविलेल्या ‘जनता दरबार’ या उपक्रमाचा गुरुवारी समारोप करण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : उपमहापौर सुनील खडके यांनी महिनाभरापासून राबविलेल्या ‘जनता दरबार’ या उपक्रमाचा गुरुवारी समारोप करण्यात आला. या उपक्रमात ६०० हून अधिक तक्रारी उपमहापौरांकडे मांडण्यात आल्या आहे. त्यापैकी ४११ तक्रारींचा निपटारा केला असल्याचा दावा उपमहापौर सुनील खडके यांनी केला आहे. यामध्ये कचऱ्याची सफाई, गटारीची सफाई, चाऱ्या बुजणे, अतिक्रमण, पेन्शनबाबत तक्रारी होत्या. या उपक्रमातंर्गत सर्वाधिक तक्रारी या शहरातील रस्त्यांबाबत होत्या. मात्र, अमृतनंतरच या रस्त्यांचे काम होणार असल्याचे आश्वासन उपमहापौरांनी दिले आहे.

२१ जानेवारीपासून उपमहापौरांनी दर गुरुवारी ‘जनता दरबार’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेवून त्या सोडविण्यावर भर देण्यात आला होता. गुरुवारी या उपक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह मनपाचे विविध अधिकारी उपस्थित होते. गुरुवारी थंडबस्त्यात असलेली गुंठेवारी, अमृत जलप्रकल्प, मलनिस्सारण – भुमिगत गटारी या महत्वाकांक्षी योजनांना होत असलेला विलंब, आणि योजनांतून वगळल्या गेलेल्या कॉलन्या परिसर, त्याचबरोबर एलएडी पथदीवे बसविण्याचे कामांतील संथ गती आदी प्रश्नांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या.

२३ तक्रारी या जागीच सोडविण्यात आल्या.

चार दरबारात सुमारे ४११ तक्रारी या मार्गी लागल्या आहेत. बहुतांशी तक्रारी या जनता दरबारात उपस्थित विभाग प्रमुखांकडून जागच्या जागीच मार्गी लावण्यात आल्या. जनता दरबारात मागील व नविन अशा एकूण ५८५ तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. त्यातील एकूण ३९८ तक्रारी मार्गी लागल्यात तर उर्वरित १८७ तक्रारी सोडविण्यासाठी संबधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे , अशी माहिती उपमहापौर सुनील खडके यांनी दिली. दरम्यान, रस्त्यांचा प्रश्नावर अनेक नागरिकांनी प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे देखील गाऱ्हाणी मांडत नाराजी व्यक्त केली.