शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कॉपीमुक्त अभियानाची एैशीतैशी; तुम्ही ‘बाऊ’ करता म्हणूनच गैरप्रकार घडतात!

By अमित महाबळ | Updated: March 6, 2023 14:31 IST

कॉपी रोखण्यासाठी केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी, कडक कारवाई झाली तरच परीक्षेतील गैरप्रकार थांबू शकतात

अमित महाबळ

जळगाव : दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच विद्यार्थ्यांनी सरकारच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची ऐशीतैशी करून टाकली आहे. मायमराठीच्या पेपरला काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरविणाऱ्यांचा सुळसुळाट होता; पण कॉलेजमध्ये गेल्यावर हीच मुले-मुली सुतासारखी सरळ होतात. कॉपी करण्याची हिंमत करत नाहीत. मग नेमके चुकतेय कोणाचे? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

कॉपी रोखण्यासाठी केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी, कडक कारवाई झाली तरच परीक्षेतील गैरप्रकार थांबू शकतात. संस्थाचालक, केंद्रचालक, शिक्षक, शासकीय यंत्रणा या सगळ्यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. जे विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर जमते ते शाळांमध्येही शक्य असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे.

अवाजवी महत्त्व वाढवल्याचे परिणाम

दहावी, बारावीच्या परीक्षांचे महत्त्व अवाजवी वाढवले आहे. भरपूर गुण मिळविण्याचा विद्यार्थ्यांवर दबाव असतो, शाळांनाही आपला चांगला निकाल हवा असतो. कॉपी रोखण्यात संस्थाचालक, शिक्षक, शिक्षण विभाग यांची भूमिका महत्त्वाची आहे. कॉपी करून पास होणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेणे. पालक व शिक्षकांनी हे विद्यार्थ्यांना समजावून सांगावे. महाविद्यालयीन स्तरावर कॉपी कमी आहे. कबचौउमविचे प्रथम कुलगुरु डॉ. एन. के. ठाकरे यांनी कॉपीविरोधात कडक भूमिका घेतली होती. विद्यापीठाचा परीक्षा विभाग परीक्षेतील गैरप्रकारांच्या संदर्भात अतिशय कठोर आहे. कॉपी प्रकरणांना थारा देत नाही. त्यावर कारवाई केली जाते.

- डॉ. के. बी. पाटील, माजी कुलगुरू, कबचौउमवि

त्यांनी तर विरोध पत्करला

दहावी, बारावीच्या परीक्षेत कोणत्याही यंत्रणेने कॉपीला वाव देऊ नये. विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर कॉपी होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांनी कॉपीमुक्त परीक्षांसाठी काही संस्थाचालक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचाही विरोध पत्करला होता. विद्यापीठाचे कॉपी केसचे नियम कडक आहेत, विद्यार्थ्यांना डिबार केले जाते. महाविद्यालयात आल्यावर विद्यार्थी मॅच्युअर्ड होतात. मेहनतीने पदवी घ्यावी लागेल हे त्यांना कळलेले असते. दहावी, बारावीचे विद्यार्थी वयानुसार अल्लड असतात. या सर्वांमध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.

- प्रा. दीपक दलाल, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यापीठ

विद्यार्थी, महाविद्यालय दोघांवर कारवाई होते

महाविद्यालयात कॉपीला थारा नसतो. कडक तपासणी असते. वर्गात लेखन साहित्याशिवाय इतर काहीच आणू देत नाही. कुणी आढळून आला तर त्याला चौकशीसाठी बोलावले जाते. दोषी आढळला तर त्याच्यावर व महाविद्यालयावरदेखील कारवाई होते. बारावीनंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता आलेली असते, करिअरचा दबाव असतो. त्यामुळे ही मुले शक्यतो गैरमार्गाला जाण्याचे धजावत नाहीत. दहावी, बारावीला कॉपी रोखण्याच्या कठोर तरतुदी आहेत. त्यानुसार कारवाई झाली पाहिजे.

- डॉ. एल. पी. देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा

आता तर मराठी झाला, इंग्रजी अन् गणित बाकी

कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रचालक, शिक्षक यांची मानसिकता बदलायला हवी. पालकांचे प्रबोधन झाले पाहिजे. विद्यार्थी नववीपर्यंतच्या परीक्षा देतातच. त्यानंतर एकदम दहावीच्या परीक्षेचा ‘बाऊ’ केला जातो. यातून मग या परीक्षेत गैरप्रकार घडतात. आता तर मराठीचा पेपर झाला आहे. अजून इंग्रजी व गणित बाकी आहेत. शासकीय यंत्रणांनी कॉपीवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

- चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ

टॅग्स :ssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाexamपरीक्षाJalgaonजळगाव