शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

मेहरूण तलावाचे सुशोभिकरण होतेय, सफाईचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 18:50 IST

जळगाव मनपाचे होतेय दुर्लक्ष: सफाईची मागणी

ठळक मुद्देसुशोभिकरणावर कोट्यवधीचा निधी खर्चसफाईकडे मात्र दूर्लक्षतलावात धुतली जाताय गुरे व वाहने

आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.७- मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणाचे प्रयत्न सुरू असताना व त्यावर कोट्यवधीचा निधी खर्च केला जात असताना तलावात व तलावाच्या परिसरात मात्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नुसतेच सुशोभिकरण करून उपयोग काय? असा सवाल उपस्थित होत आहे. महापौरांनी मेहरूण तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी लोकसहभागातून तसेच जलसंपदा विभागाच्या मदतीने त्यातील गाळ काढण्याची मोहीम राबविली. तसेच मनपाला डीपीडीसीतून मिळालेल्या निधीतून गणेश घाटाचे काम करण्यात आले. त्यानंतर टप्याटप्प्याने मिळालेल्या निधीतून तलावाच्या मुख्य बांधाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. तसेच तलावाच्या काठाने जॉगींग ट्रॅक, रेलिंग व सुशोभिकरणाचे काम प्रस्तावित केले आहे. मात्र हे करताना तलावात गुरे, वाहने धुण्यासाठी आणणे थांबविणे आवश्यक असताना त्यादृष्टीने प्रयत्नच झालेले नाहीत. गणेश घाटाच्या ठिकाणी गुरांना पायºयांकडे जाता येऊ नये यासाठी लोखंडी बार बसविण्यात येणार होते. गणेशघाटाच्या कामातच ते प्रस्तावित होते. मात्र ते लोखंडी बार बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गुरे या घाटाच्या पायºयांवरून पाण्यापर्यंत जातात. त्यामुळे गणेश घाटाच्या पायºयांवर शेण पडलेले असते. तसेच नागरिकांना निर्माल्य टाकण्यासाठी गणेश घाटाच्या कोपºयावरच कुंडी ठेवलेली असतानाही नागरिक पाण्यात निर्माल्य तसेच कचरा टाकतात. त्यावर निर्बंध आणण्यासाठी तेथे कुणीच नसल्याने नागरिकांचे फावते. तसेच तलावाच्या पाण्यात टाकलेला तसेच पायºयांवर पडलेला कचरा देखील नियमितपणे साफ केला जात नसल्याने सुशोभिकरणावर कोट्यवधी खर्च करूनही परिसराला अवकळा आलेली दिसते. त्यातच या तलावाच्या पाण्यातच कपडे धुतले जातात. ते तलावाच्या पायºयांवर वाळत टाकले जातात. त्यालाही निर्बंध घालण्याची गरज आहे. मात्र मनपा प्रशासनाचे त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष होत आहे.