शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

जळगावात मार्चमध्येच मे हिटचा तडाखा

By admin | Updated: March 30, 2017 17:55 IST

यंदा मार्च महिन्यातच मे हिटचा तडाखा बसू लागला आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे.

 जनजीवन प्रभावीत : दुपारी रस्ते निर्मनुष्य

जळगाव : यंदा मार्च महिन्यातच मे हिटचा तडाखा बसू लागला आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. हातावर पोट असणा:या कष्टकरी, मजूर यांना त्याचा अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे. कमाल तापमान 43 अंश सेल्सीअसवर पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच पुढील काळात तापमान 45 ते 48 अंश सेल्सीअसवर पोहोचू शकते, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. 
 
 
साधारणत: मे महिन्यात उन्हाचा पारा 43 ते 44 अंश सेल्सीअसवर पोहचतो. मे महिना म्हणजेच कहर, असे म्हटले जाते. यंदा मार्च महिन्यात सुरुवातीला थंड वातावरण होते. सायंकाळनंतर गारवाही जाणवत होता. अगदी 17 ते 18 मार्चर्पयत वातावरण फारसे उष्ण नव्हते. पण 21 मार्चपासून वातावरण तापू लागले. त्याचा फटका बालक, वृद्ध, रुग्ण यांना अधिकचा सहन करावा लागत आहे. गुरुवारी 43 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे. 
 
 
सर्वाधिक 46.7 अंश सेल्सीअस तापमानाची 2009 मध्ये नोंद
हवामानशास्त्र विभागानुसार गेले पाच वर्षे मे महिन्यात कमाल तापमान अन्य महिन्यांच्या तुलनेत अधिक होते. 1 मे 2009 रोजी 46.7 र्पयत कमाल तापमान होते. गेल्या पाच वर्षामधील हे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद आहे. किमान तापमान 15 व कमाल तापमान 40 सेंटीग्रेड असल्यास पिके, सजीव यांच्यासाठी सुकर वातावरण मानले जाते. पण वर्षातील 365 दिवसांमध्ये 60 पेक्षा अधिक दिवस कमाल तापमान 40 सेंटीग्रेडर्पयत व अनेकदा त्या पेक्षा अधिक राहत असल्याचा अनुभव तज्ज्ञांना अलीकडच्या दोन वर्षांत आला आहे. पर्यावरणाचा वर्षागणिक ढासळणारा समतोल तापमानातील चढ-उतारास किंवा ग्लोबल वॉर्मिगला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
 
 
हवामानशास्त्र विभागाचा सतर्कतेचा इशारा
येत्या चार ते पाच दिवसात पारा 42 अंश किंवा यापेक्षा अधिक राहू शकतो. त्यात 31 रोजी 43 अंश, 1 एप्रिल रोजी 42.8 अंश, 2 एप्रिल रोजी 42.9 अंश, 3 एप्रिल रोजी 43.1 अंश, 4 एप्रिल रोजी 43.00 अंश सेल्सीअस तापमान राहू शकते, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.