शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

मका खरेदी दराच्या चौकशीत हेराफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

महाराष्ट्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने भावांतर योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत राज्यभरातील कोणत्याही ...

महाराष्ट्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने भावांतर योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत राज्यभरातील कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या शासनाने ठरवलेल्या हमीभावापेक्षा कमी भावात लिलाव झाला तर संबंधित शेतकऱ्याने सहायक उपनिबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज देऊन संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन विकल्या गेलेला मालाच्या व हमीभावाचा जो भाव फरक असेल तो भाव फरक शासन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळवून देतो अशी योजना आहे. त्या अनुषंगाने ४ फेब्रुवारी २०२१ रोजी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्डी येथील आधार शंकर पाटील व नरेंद्र धनसिंग पाटील यांनी मका विक्रीस आणला होता. या शेतकऱ्यांचा मका प्रति क्विंटल १ हजार २३७ रुपयांप्रमाणे विकला गेला होता. व मक्याचा हमीभाव १ हजार ८५० रुपये जाहीर केला आहे. विक्रीनंतर हमीभावातील भाव फरक ६१३ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे या दोघा शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे रीतसर व कायद्याने लेखी अर्ज देऊन तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक यांनी चोपड्यातील सहायक निबंधक के. पी. पाटील यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणाची चौकशी करत असताना चौकशीत सहायक निबंधक यांनी मार्केट कमिटीने शेतकऱ्यांना दिशाभूल करणारा अहवाल सादर केल्याबद्दल मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली असल्याचे संबंधित शेतकरी सांगत आहेत. तसेच कुठलाही शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणे हा कायद्याने गुन्हाच आहे. याची पण नोंद चौकशीमध्ये केली तसेच शेतीमाल एफ. ए. क्यू. व नॉन एफ. ए. क्यू व्यापाऱ्यांना ठरवण्याचा अधिकार नाही. हे पण चौकशीत नमूद केले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर प्रत्येक बिलावर नॉन एफ. ए. क्यूचा शिक्का का मारतो ही बाब पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लक्षात आणून दिली. कृषी उत्पन्न बाजार समिती संबंधित व्यापाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्यांनी केला आहे. ज्या मार्केटला शेतकऱ्यांच्या जीवावर कोरोना काळात ही एवढा मोठा नफा झाला आहे. त्याच बाजार समितीचे संचालक मंडळ व कर्मचारी शेतकऱ्यांची बाजू न धरता व्यापाऱ्यांचीच बाजू मांडतात. हे कितपत योग्य आहे. सहायक निबंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने अधिनियम १९६३ चे ३२ ड नुसार हमीभावापेक्षा कमी भावात शेतमाल खरेदी केला जात असल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा उपनिबंधक यांनी कारवाई करावी अशी सूचना सहायक निबंधक चोपडा यांनी अर्ज निकाली काढलेला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सचिव वरिष्ठ लिपिक तसेच सहायक निबंधक के. पी. पाटील शेतकऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास शेतकरी संघटना व तक्रारदार शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषण करतील असे मत शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किरण गुजर, सचिन शिंपी तालुकाध्यक्ष चोपडा, विनोद धनगर वर्डी, नरेंद्र धनसिंग पाटील वर्डी, तसेच रवींद्र पाटील खडगाव प्रहार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया :-

माझा मका हमीभावापेक्षा कमी दराने घेतला आहे. मला हमीभाव(१८५०) मिळावा यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे. फरक रक्कम मिळवून देणे जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची असल्याने मला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.

संदीप आधार पाटील, तक्रारदार शेतकरी