शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

ममुराबाद ग्रा.पं. निवडणुकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST

ग्रामस्थांचे लक्ष : राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात सुमारे ...

ग्रामस्थांचे लक्ष : राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात सुमारे ४३ उमेदवार असले तरी सहा ठिकाणच्या जागांकडे ग्रामस्थांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण दोन माजी सरपंचांसह विकास सोसायटीतील आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनी तिथे उमेदवारी केली आहे. त्यापैकी कोण निवडणुकीत बाजी मारतो त्याची सर्वांना उत्कंठा लागली आहे.

ममुराबादगावातील वॉर्ड एकमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव जागेसाठी माजी सरपंच हेमंत गोविंद चौधरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. उल्हास नारायण कोलते यांच्यात सरळ लढत रंगली आहे. हेमंत चौधरी यांचे वडील (कै.) गोविंद हरी चौधरी हेसुद्धा कधीकाळी ग्रामपंचायतीचे सरपंच व जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. वॉर्ड एकमध्येच सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष अनिल पाटील यांच्या पत्नी अलका अनिल पाटील यांनी उमेदवारी केली आहे. त्यांच्याविरोधात अनिता प्रभाकर ढाके व रंजना जितेंद्र ढाके यांनी अर्ज दाखल केले आहेत.

वॉर्ड दोनमध्ये सर्वसाधारण जागेसाठी माजी सरपंच अमर गंगाराम पाटील यांनी यंदा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना पोलीसपाटील आशा पाटील यांचे पती धनराज ज्ञानेश्वर पाटील यांनी आव्हान दिले आहे. वॉर्ड चारमध्ये अनुसूचित जाती राखीव जागेसाठी माजी सरपंच रमाबाई गुलाबराव सोनवणे यांचे चिंरजीव विलास सोनवणे यांची उमेदवारी आहे. त्यांच्या विरोधात विजय पितांबर सोनवणे व महेंद्र दिलीप सोनवणे यांचे अर्ज आहेत. पैकी महेंद्र सोनवणे यांनी अधिकृतपणे माघार घेतली नसली तरी विलास सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. वॉर्ड सहामध्ये अनुसूचित जमाती राखीव जागेसाठी माजी सरपंच भाग्यश्री मोरे यांचे वडील गोपालकृष्ण उखा मोरे यांची उमेदवारी असून, त्यांच्याविरोधात भोलेनाथ नागेश्वर माळी हे उमेदवार आहेत. याशिवाय वॉर्ड सहामध्येच सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी माजी सरपंच महेश सोपानदेव चौधरी यांच्या वहिनी सुनीता अनंत चौधरी यांची उमेदवारी आहे. त्यांच्याविरोधात विकास सोसायटीचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या वहिनी अश्विनी शरद पाटील यांची उमेदवारी आहे. पैकी सुनीता चौधरी यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद भूषविले आहे.

-------------------

सरपंचपदाकडे लागले सर्वांचे लक्ष

यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने इच्छुकांचा मोठा हिरमोड झाला आहे. तरीही अनेकांनी उद्या आरक्षण निघाल्यावर आपला हक्काचा उमेदवार त्यासाठी तयार पाहिजे म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगलीच कंबर कसली आहे. घरातील उमेदवार निवडून आणण्याकरिता निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसत आहे.

---------------------