शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

बालविकास प्रकल्प विभागात रिक्तपदांचे ‘कुपोषण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सहा वर्षांपर्यंतची बालके, स्तनदा माता, गर्भवती महिला लाभार्थी असलेल्या अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्याची प्रमुख जबाबदारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सहा वर्षांपर्यंतची बालके, स्तनदा माता, गर्भवती महिला लाभार्थी असलेल्या अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्याची प्रमुख जबाबदारी असलेली बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची १९ पैकी १३ पदे रिक्त आहेत. गंभीर बाब म्हणजे आदिवासी भागातही अधिकारीच नसल्याने बालकांना, मातांना गुणवत्तापूर्ण पोषण मिळणार कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही पदे रिक्त असून शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

कोविडच्या काळात पोषण, प्रतिकारक्षमता, या बाबी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. अनेक आदिवासी, ग्रामीण भागात याबाबत पुरेशी जनजागृती नसते. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढणे, प्रतिकारक्षमता कमी असणे, यामुळे आजार बळावतात. त्यासाठी अंगणवाड्यांच्या माध्यमातून जनजागृतीसह बालके व मातांना योग्य पोषण उपलब्ध करून देण्याची त्यांच्याकडे वारंवार लक्ष देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात सहा वर्षांपर्यंतची बालके, स्तनदा माता, गर्भवती महिला हे अंगणवाडीत लाभार्थी असतात, त्यांची तपासणी असेल, वजन मोजणे असेल, त्यांना आहार पुरविणे असेल, आवश्यक त्या व्हिटॅमिनच्या गोळ्या पुरविणे असेल, अशी महत्त्वाची कामे ग्रामीण भागात अंगणवाडीच्या माध्यमातून केली जातात, यात आदिवासी भागात या अंगणवाड्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी पुरेसे नसल्याने या अंगणवाड्यांवर नक्की नियंत्रण मिळविणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तिसऱ्या लाटेत महत्त्वाची भूमिका

तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आहे. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर उपाययोजना होणे गरजेचे आहे. शहरी भागात पुरेशा सुविधा मिळाल्या तरी ग्रामीण भागात त्यांची कमतरता आहेच, अशा स्थितीत गरीब, गरजू बालकांना अंगणवाडी तसेच शाळांमधून मध्यान्ह भोजन, पोषण आहार या बाबी वेळेवर मिळाल्यास पुढील धोके टाळता येणार आहेत. मात्र, अधिकारीच वर्ग नसेल तर यावर नियंत्रण ठेवणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोट

ही पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. शासनाला विभागाकडून वारंवार मागणी केली जात असते. मात्र, ही पदे भरली जात नसल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येत असल्याने याचा कामावर परिणाम होत आहे.

- आर. आर. तडवी, महिला व बालकल्याण अधिकारी, जि. प.

अशी आहे स्थिती

एकूण पदे १९

भरलेली पदे ०६

रिक्त पदे १३

यावल, चोपडा या तालुक्यांत या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी दोन पदे असून ती चारही पदे रिक्त आहेत. यासह रावेर तालुक्यात एक पद रिक्त आहे. अशा महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये ही पदे रिक्त असल्याचे गंभीर चित्र आहे.