शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाने खूप, ते पेलतील नवीन सीईओ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST

नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचे पहिले पाऊल काय? यावर त्यांची पुढील वाटचाल कशी राहणार, असा कयास अनेक जण अनुभवातून लावतात. जिल्हा ...

नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचे पहिले पाऊल काय? यावर त्यांची पुढील वाटचाल कशी राहणार, असा कयास अनेक जण अनुभवातून लावतात. जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सोमवारी पदभार घेतला. त्यांनी प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावाही घेतला, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. तातडीने जिल्हा परिषदेची सद्य:स्थिती त्यांनी जाणून घेतली. विकासात्मक दृष्टिकोण ठेवून त्याची अंमलबजावणी करताना आहे त्यात अधिक चांगले काम करणे किंवा नवीन संकल्पना राबविणे या दोन बाबी महत्त्वाच्या ठरतात, डॉ. आशिया यातील नेमके कशाला प्राधान्य देणार? हे समजेलच. मात्र, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशी काही आव्हाने ते लिलया पेलतील, असे संकेत आता तरी मिळत आहेत.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांच्या कारकीर्दीत काही पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळाले, काही योजनांमध्ये जिल्हा उत्कृष्ट राहिला. मात्र, काही त्रुटी कायम आहेत. यात कामांना होणारा विलंब, मनुष्यबळ कमतरता, अनेक महत्त्वांच्या पदांवर अधिकारी नसणे, अनेक पदांवर वर्षानुवर्षे प्रभारी अधिकारी असणे, असे काही मुद्दे हे निकाली निघालेले नाहीत, आरोग्य विभागातील कर्मचारी कमतरतेचा तसेच पदोन्नत्यांचा विषय चार वर्षे होऊनही मार्गी लागलेला नाही. जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळवून देणाऱ्या काही संकल्पना राबविल्या गेल्या नाहीत. जिल्हा परिषदेची मोठी आर्थिक बचत करू शकणारा छापखाना हा विषय केवळ सभांपुरताच मर्यादित राहिला. ही काही आव्हाने आता डॉ. आशिया यांच्यासमोर असतील, त्यातच सहा ते आठ महिन्यांनी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यात राजकीय गर्दी जिल्हा परिषदेत वाढणार आहे. त्याचा एक दबाव प्रशासकीय यंत्रणेवर येईलच. सीईओ डॉ. पंकज आशिया हे स्वत: एमबीबीएस आहेत. त्यांनी मालेगाव येथे उत्तम काम केले आहे. भिवंडी महापालिकेतही आयुक्त म्हणून त्यांनी छाप पाडली आहे. जिल्ह्यात कोविडमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणात त्यांचा मोठा हातभार लागेल, असे एकंदरीत चित्र सध्यातरी दिसतेय. त्यांनी नुकतीच जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन लसीकरणासह अन्य सर्व लसीकरण तसेच राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती घेतली आहे. यातून आरोग्यावर त्यांचे अधिक लक्ष असेल असे स्पष्ट होतेय. २०१६ बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. पंकज आशिया मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण यंत्रणेत बिग डेव्हलपमेंट करतील, अशी अपेक्षा आहे.