शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जिल्ह्यात साडे आठ हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील शेतजमिनीचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील शेतजमिनीचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यात अतिवृष्टी झालेल्या चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. एकट्या चाळीसगाव तालुक्यात ५ हजार ५०१ हेक्टरचे तर जामनेरला २ हजार ६७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. त्यात एकूण १३२ गावांमधील १२ हजार ९६६ शेतकऱ्यांना या अति पावसाचा फटका बसला. यात उडिदाचे ५२ हेक्टर, मूग २१ हेक्टर, बाजरी २२.४० हेक्टर, कापूस ५ हजार ९९३.८५ हेक्टर, मका १६९९ हेक्टर, पपई ७.५० हेक्टर, केळी ३७ हेक्टर, भाजीपाला १६३ हेक्टर आणि इतर ४१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच ३० हेक्टरवरील फळपिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

कापूस आणि मक्याला मोठा फटका

जिल्ह्यात कापसाचे जे नुकसान झाले आहे. त्यात एकट्या चाळीसगाव तालुक्यात ४ हजार ५२ हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच जामनेर तालुक्यातदेखील १ हजार ७४६ हेक्टरवरील कापूस वाया जाण्याची भीती आहे. या दोन तालुक्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने सर्वात जास्त नुकसान केले आहे.

तालुका, बाधित गावे, शेतकरी एकूण नुकसान (हेक्टर)

जळगाव २३ ३१४ २९२

चाळीसगाव ६९ ९५८२ ५५०१

पाचोरा २ २५ १०

जामनेर ५२ ३२३५ २६७६.६०

चोपडा ९ १२४ ४९.६५

पारोळा ३ २५ २०