शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जिल्ह्यात साडे आठ हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील शेतजमिनीचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील शेतजमिनीचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यात अतिवृष्टी झालेल्या चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. एकट्या चाळीसगाव तालुक्यात ५ हजार ५०१ हेक्टरचे तर जामनेरला २ हजार ६७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. त्यात एकूण १३२ गावांमधील १२ हजार ९६६ शेतकऱ्यांना या अति पावसाचा फटका बसला. यात उडिदाचे ५२ हेक्टर, मूग २१ हेक्टर, बाजरी २२.४० हेक्टर, कापूस ५ हजार ९९३.८५ हेक्टर, मका १६९९ हेक्टर, पपई ७.५० हेक्टर, केळी ३७ हेक्टर, भाजीपाला १६३ हेक्टर आणि इतर ४१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच ३० हेक्टरवरील फळपिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

कापूस आणि मक्याला मोठा फटका

जिल्ह्यात कापसाचे जे नुकसान झाले आहे. त्यात एकट्या चाळीसगाव तालुक्यात ४ हजार ५२ हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच जामनेर तालुक्यातदेखील १ हजार ७४६ हेक्टरवरील कापूस वाया जाण्याची भीती आहे. या दोन तालुक्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने सर्वात जास्त नुकसान केले आहे.

तालुका, बाधित गावे, शेतकरी एकूण नुकसान (हेक्टर)

जळगाव २३ ३१४ २९२

चाळीसगाव ६९ ९५८२ ५५०१

पाचोरा २ २५ १०

जामनेर ५२ ३२३५ २६७६.६०

चोपडा ९ १२४ ४९.६५

पारोळा ३ २५ २०