शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साडे आठ हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील शेतजमिनीचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील शेतजमिनीचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यात अतिवृष्टी झालेल्या चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. एकट्या चाळीसगाव तालुक्यात ५ हजार ५०१ हेक्टरचे तर जामनेरला २ हजार ६७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. त्यात एकूण १३२ गावांमधील १२ हजार ९६६ शेतकऱ्यांना या अति पावसाचा फटका बसला. यात उडिदाचे ५२ हेक्टर, मूग २१ हेक्टर, बाजरी २२.४० हेक्टर, कापूस ५ हजार ९९३.८५ हेक्टर, मका १६९९ हेक्टर, पपई ७.५० हेक्टर, केळी ३७ हेक्टर, भाजीपाला १६३ हेक्टर आणि इतर ४१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच ३० हेक्टरवरील फळपिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

कापूस आणि मक्याला मोठा फटका

जिल्ह्यात कापसाचे जे नुकसान झाले आहे. त्यात एकट्या चाळीसगाव तालुक्यात ४ हजार ५२ हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच जामनेर तालुक्यातदेखील १ हजार ७४६ हेक्टरवरील कापूस वाया जाण्याची भीती आहे. या दोन तालुक्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने सर्वात जास्त नुकसान केले आहे.

तालुका, बाधित गावे, शेतकरी एकूण नुकसान (हेक्टर)

जळगाव २३ ३१४ २९२

चाळीसगाव ६९ ९५८२ ५५०१

पाचोरा २ २५ १०

जामनेर ५२ ३२३५ २६७६.६०

चोपडा ९ १२४ ४९.६५

पारोळा ३ २५ २०