शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

शांतीपर्वातील मौनाची अक्षरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

प्राचार्य डॉ. किसन पाटील कोरोना महामारीचा हा लाॅकडाऊनचा कडीबंद काळ साऱ्या विश्वाला संकट काळ ठरला. जगण्याचे निर्बंध साहित्य, लेखन ...

प्राचार्य डॉ. किसन पाटील

कोरोना महामारीचा हा लाॅकडाऊनचा कडीबंद काळ साऱ्या विश्वाला संकट काळ ठरला. जगण्याचे निर्बंध साहित्य, लेखन आणि कला क्षेत्रावरही उमटले. यामध्ये छपाई, प्रकाशन व्यवसाय, पुस्तक विक्रीत मंदी आली. ग्रंथालय बंद यामुळे वाचनात खंड पडला, मात्र या काळात लेखक, कवी, कलावंतांना एकांतवासात निर्मितीला संधी मिळाली. प्रत्यक्षातले परिसंवाद, साहित्य संमेलने, चर्चासत्रे यावर निर्बंध आली; परंतु ऑनलाइनची संधी यामुळेच घेता आली.

महामारीच्या अडचणी उभ्या राहिल्या; परंतु सोशल मीडियावरून विचार, विकार प्रगती करण्याची भरमार अव्याहतपणे सुरू होती. या चर्चेत बऱ्याचदा वास्तव आणि ज्ञानात्मकतेपेक्षा एकांगी विचार, अंध भक्तियुक्त पूर्वग्रह दूषित भावनांचे पडसाद उमटले. गटबाजी आणि आग्रही मतांची धुळवड उडत राहिली.

साहित्य निर्मितीला या विजनवासातील ‘शांतीपर्व’ अनुभवता आले. संत ज्ञानेश्वरांच्या ‘मौनाची अक्षरे’ या आध्यात्मिक सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. विशेषतः गद्यापेक्षा पद्य-काव्यलेखनाच्या निर्मितीतील संधीच सापडली. काव्य मैफिली रंगल्या, विविध लिंकवरील परिसंवाद, भाषणे आणि विचारप्रबोधन - परिवर्तनामुळे वातावरण उत्साहित झाले. दिवाळी अंकाच्या निर्मितीवर काहीसे अनुत्साहाचे सावट आले. मात्र, कोरोनाच्या काळातही हे दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आले.

मानसिक, भावनिक आणि आरोग्यविषयक चिंता आणि चिंतन, कोरोना काव्य कथा- कादंबरी आणि लेखन विपुल प्रमाणात झाले. ब्लॉग लेखन, वार्तापत्रे, ऑनलाइन वृत्तपत्र आवृत्त्या, दूरदर्शन, रेडिओ इत्यादी माध्यमांतून संवाद सुरू होता. साहित्यनिर्मिती, संवाद क्रिया, लेखनप्रक्रिया यांनी नवी दिशा घेतली. संवेदनशीलता हा साहित्यनिर्मितीचा मूलस्रोत असतो याची नव्याने जाणीव, जागृती झाली. महामारीने बोथट संवेदना अशा प्रचलित झाल्या, त्याच्या अनुभवाचा हा काळ ठरला. मानवतावादी-वैश्विक जाणिवा जोपासल्या गेल्या. महायुद्ध-अणुयुद्धानंतर प्रथमच शीतयुद्धाच्या जैविक विषाणुयुद्धाची चर्चा, स्वानुभव सध्या सारे विश्व घेत आहे. ‘कडीबंद’ कथासंग्रह (अशोक कोळी) आणि लॉकडाऊन (कादंबरी - श्रीकांत पाटील) यासारख्या आणि हजारो कवितांचे प्रसारण लक्षणीय ठरले. या काळात मला अनेक रेखाटने करता आली. ‘पंख पिसारा’ - बालकविता संग्रह, ‘प्रेमरंग’ (चित्र काव्यसंग्रह), ‘लोकरंगभूमी’ (अभ्यास ग्रंथ), ‘पाणी’ (दीर्घकाव्य) आणि ‘शेकडो अभंग’ काव्यरचना करण्यासाठी हा विजनवास उपयुक्त ठरला. काळाच्या हातचे माणूस बाहुले असतो हा जिवंत अनुभव दृढ झाला.