शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

शांतीपर्वातील मौनाची अक्षरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

प्राचार्य डॉ. किसन पाटील कोरोना महामारीचा हा लाॅकडाऊनचा कडीबंद काळ साऱ्या विश्वाला संकट काळ ठरला. जगण्याचे निर्बंध साहित्य, लेखन ...

प्राचार्य डॉ. किसन पाटील

कोरोना महामारीचा हा लाॅकडाऊनचा कडीबंद काळ साऱ्या विश्वाला संकट काळ ठरला. जगण्याचे निर्बंध साहित्य, लेखन आणि कला क्षेत्रावरही उमटले. यामध्ये छपाई, प्रकाशन व्यवसाय, पुस्तक विक्रीत मंदी आली. ग्रंथालय बंद यामुळे वाचनात खंड पडला, मात्र या काळात लेखक, कवी, कलावंतांना एकांतवासात निर्मितीला संधी मिळाली. प्रत्यक्षातले परिसंवाद, साहित्य संमेलने, चर्चासत्रे यावर निर्बंध आली; परंतु ऑनलाइनची संधी यामुळेच घेता आली.

महामारीच्या अडचणी उभ्या राहिल्या; परंतु सोशल मीडियावरून विचार, विकार प्रगती करण्याची भरमार अव्याहतपणे सुरू होती. या चर्चेत बऱ्याचदा वास्तव आणि ज्ञानात्मकतेपेक्षा एकांगी विचार, अंध भक्तियुक्त पूर्वग्रह दूषित भावनांचे पडसाद उमटले. गटबाजी आणि आग्रही मतांची धुळवड उडत राहिली.

साहित्य निर्मितीला या विजनवासातील ‘शांतीपर्व’ अनुभवता आले. संत ज्ञानेश्वरांच्या ‘मौनाची अक्षरे’ या आध्यात्मिक सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. विशेषतः गद्यापेक्षा पद्य-काव्यलेखनाच्या निर्मितीतील संधीच सापडली. काव्य मैफिली रंगल्या, विविध लिंकवरील परिसंवाद, भाषणे आणि विचारप्रबोधन - परिवर्तनामुळे वातावरण उत्साहित झाले. दिवाळी अंकाच्या निर्मितीवर काहीसे अनुत्साहाचे सावट आले. मात्र, कोरोनाच्या काळातही हे दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आले.

मानसिक, भावनिक आणि आरोग्यविषयक चिंता आणि चिंतन, कोरोना काव्य कथा- कादंबरी आणि लेखन विपुल प्रमाणात झाले. ब्लॉग लेखन, वार्तापत्रे, ऑनलाइन वृत्तपत्र आवृत्त्या, दूरदर्शन, रेडिओ इत्यादी माध्यमांतून संवाद सुरू होता. साहित्यनिर्मिती, संवाद क्रिया, लेखनप्रक्रिया यांनी नवी दिशा घेतली. संवेदनशीलता हा साहित्यनिर्मितीचा मूलस्रोत असतो याची नव्याने जाणीव, जागृती झाली. महामारीने बोथट संवेदना अशा प्रचलित झाल्या, त्याच्या अनुभवाचा हा काळ ठरला. मानवतावादी-वैश्विक जाणिवा जोपासल्या गेल्या. महायुद्ध-अणुयुद्धानंतर प्रथमच शीतयुद्धाच्या जैविक विषाणुयुद्धाची चर्चा, स्वानुभव सध्या सारे विश्व घेत आहे. ‘कडीबंद’ कथासंग्रह (अशोक कोळी) आणि लॉकडाऊन (कादंबरी - श्रीकांत पाटील) यासारख्या आणि हजारो कवितांचे प्रसारण लक्षणीय ठरले. या काळात मला अनेक रेखाटने करता आली. ‘पंख पिसारा’ - बालकविता संग्रह, ‘प्रेमरंग’ (चित्र काव्यसंग्रह), ‘लोकरंगभूमी’ (अभ्यास ग्रंथ), ‘पाणी’ (दीर्घकाव्य) आणि ‘शेकडो अभंग’ काव्यरचना करण्यासाठी हा विजनवास उपयुक्त ठरला. काळाच्या हातचे माणूस बाहुले असतो हा जिवंत अनुभव दृढ झाला.