शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शांतीपर्वातील मौनाची अक्षरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

प्राचार्य डॉ. किसन पाटील कोरोना महामारीचा हा लाॅकडाऊनचा कडीबंद काळ साऱ्या विश्वाला संकट काळ ठरला. जगण्याचे निर्बंध साहित्य, लेखन ...

प्राचार्य डॉ. किसन पाटील

कोरोना महामारीचा हा लाॅकडाऊनचा कडीबंद काळ साऱ्या विश्वाला संकट काळ ठरला. जगण्याचे निर्बंध साहित्य, लेखन आणि कला क्षेत्रावरही उमटले. यामध्ये छपाई, प्रकाशन व्यवसाय, पुस्तक विक्रीत मंदी आली. ग्रंथालय बंद यामुळे वाचनात खंड पडला, मात्र या काळात लेखक, कवी, कलावंतांना एकांतवासात निर्मितीला संधी मिळाली. प्रत्यक्षातले परिसंवाद, साहित्य संमेलने, चर्चासत्रे यावर निर्बंध आली; परंतु ऑनलाइनची संधी यामुळेच घेता आली.

महामारीच्या अडचणी उभ्या राहिल्या; परंतु सोशल मीडियावरून विचार, विकार प्रगती करण्याची भरमार अव्याहतपणे सुरू होती. या चर्चेत बऱ्याचदा वास्तव आणि ज्ञानात्मकतेपेक्षा एकांगी विचार, अंध भक्तियुक्त पूर्वग्रह दूषित भावनांचे पडसाद उमटले. गटबाजी आणि आग्रही मतांची धुळवड उडत राहिली.

साहित्य निर्मितीला या विजनवासातील ‘शांतीपर्व’ अनुभवता आले. संत ज्ञानेश्वरांच्या ‘मौनाची अक्षरे’ या आध्यात्मिक सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. विशेषतः गद्यापेक्षा पद्य-काव्यलेखनाच्या निर्मितीतील संधीच सापडली. काव्य मैफिली रंगल्या, विविध लिंकवरील परिसंवाद, भाषणे आणि विचारप्रबोधन - परिवर्तनामुळे वातावरण उत्साहित झाले. दिवाळी अंकाच्या निर्मितीवर काहीसे अनुत्साहाचे सावट आले. मात्र, कोरोनाच्या काळातही हे दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आले.

मानसिक, भावनिक आणि आरोग्यविषयक चिंता आणि चिंतन, कोरोना काव्य कथा- कादंबरी आणि लेखन विपुल प्रमाणात झाले. ब्लॉग लेखन, वार्तापत्रे, ऑनलाइन वृत्तपत्र आवृत्त्या, दूरदर्शन, रेडिओ इत्यादी माध्यमांतून संवाद सुरू होता. साहित्यनिर्मिती, संवाद क्रिया, लेखनप्रक्रिया यांनी नवी दिशा घेतली. संवेदनशीलता हा साहित्यनिर्मितीचा मूलस्रोत असतो याची नव्याने जाणीव, जागृती झाली. महामारीने बोथट संवेदना अशा प्रचलित झाल्या, त्याच्या अनुभवाचा हा काळ ठरला. मानवतावादी-वैश्विक जाणिवा जोपासल्या गेल्या. महायुद्ध-अणुयुद्धानंतर प्रथमच शीतयुद्धाच्या जैविक विषाणुयुद्धाची चर्चा, स्वानुभव सध्या सारे विश्व घेत आहे. ‘कडीबंद’ कथासंग्रह (अशोक कोळी) आणि लॉकडाऊन (कादंबरी - श्रीकांत पाटील) यासारख्या आणि हजारो कवितांचे प्रसारण लक्षणीय ठरले. या काळात मला अनेक रेखाटने करता आली. ‘पंख पिसारा’ - बालकविता संग्रह, ‘प्रेमरंग’ (चित्र काव्यसंग्रह), ‘लोकरंगभूमी’ (अभ्यास ग्रंथ), ‘पाणी’ (दीर्घकाव्य) आणि ‘शेकडो अभंग’ काव्यरचना करण्यासाठी हा विजनवास उपयुक्त ठरला. काळाच्या हातचे माणूस बाहुले असतो हा जिवंत अनुभव दृढ झाला.