शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पुन्हा भरारी घेऊ, आत्मनिर्भर होऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:32 IST

स्थलांतराचा कटू अनुभव घेतला. तसा मजूर, कामगार परतू लागल्याचा सुखद दिलासादेखील कालांतराने मिळाला. व्यापार, व्यवसाय आणि उद्योग पुन्हा गती ...

स्थलांतराचा कटू अनुभव घेतला. तसा मजूर, कामगार परतू लागल्याचा सुखद दिलासादेखील कालांतराने मिळाला. व्यापार, व्यवसाय आणि उद्योग पुन्हा गती घेऊ लागले. कोरोनापूर्व वेग नसला तरी चाके हलू लागली, हेदेखील खूप महत्त्वाचे आहे.

कोरोनामुळे आरोग्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला. नऊ महिन्यांच्या लॉकडाऊन काळात आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. कुटुंब, आरोग्य ही मोठी संपत्ती आहे. त्याची काळजी, देखभाल घेणे खूप महत्त्वाचे आहे, हा धडा, संदेश या काळाने दिला. प्रत्येक नागरिक सजगपणे, सतर्कपणे या दोन विषयांवर विचार करू लागला. आयुष्यात अनावश्यक, अकारण केल्या जाणाऱ्या बाबी ध्यानात आल्या. त्यावाचून काही अडत नाही, हे लक्षात आले. कौटुंबिक स्नेह, संवाद व संबंध अधिक दृढ झाले. हे केवळ कुटुंबामध्येच झाले असे नाही तर व्यापार, व्यवसाय व उद्योगातदेखील कौटुंबिक भावना दृढ झाली. संकट काळ, अडचणीच्या काळात व्यवस्थापन व कर्मचारी या दोन्ही घटकांनी एकमेकांना समजून घेतले. परस्परांना विश्वास दिला. सारे काही पूर्ववत होईल, अशी ग्वाही या स्नेहबंधातून निर्माण झाली.

आरोग्य क्षेत्राचे महत्त्व साऱ्या जगाला पटले. गावपातळीवर आरोग्य सुविधा निर्माण होण्याची आवश्यकता लक्षात आली. शासन व प्रशासनाने कसोशीने प्रयत्न करून आरोग्य सेवा केली. समाजानेदेखील पुढाकार घेत प्रशासनाची मदत केली.