शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST

ताबा दाखला रद्द झाल्याने प्लॉट परत देण्याची मागणी जळगाव : एमआयडीसीमधील प्लॉट क्रमांक ४५/२ चा ताबा दाखला रद्द ...

ताबा दाखला रद्द झाल्याने प्लॉट परत देण्याची मागणी

जळगाव : एमआयडीसीमधील प्लॉट क्रमांक ४५/२ चा ताबा दाखला रद्द झाल्यामुळे हा प्लॉट एमआयडीच्या ताब्यात घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष संदीप मांडोळे यांनी केली आहे. या विषयी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्लॉट मालकाने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला होता. मात्र तो खोटा असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार हा प्लॉट पुन्हा एमआयडीच्या ताब्यात देण्यात यावा व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवासी झाले त्रस्त

जळगाव : पाऊस झाल्यानंतर शहरातील विविध भागात पाणी साचण्यासह रामानंद नगर घाटाच्या खाली श्रीधर नगरनजीक भररस्त्यावर पाणी साचते. या पाण्याचा नाल्यामध्ये निचरा होत नसल्याने ते परिसरातही पसरते. यामुळे या भागातील रहिवाशांसह व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत.

साफसफाईची मागणी

जळगाव : न्यू बी. जे. मार्केट परिसरात प्रचंड कचरा साचला आहे. तसेच नाल्यांच्या शेजारी कचऱ्याचे ढीग झाले आहेत. परिणामी, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

अपघाताचा धोका

जळगाव : पिंप्राळा रिक्षा स्टॉपकडून बाजार रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. दगड-खडींचा वापर करून खड्डा बुजविण्यात आला आहे. यात दुचाकी घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.