शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मुलांनी सोडले जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST

आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आयुष्यभर आपल्या मुलांसाठी राबल्यानंतर त्यांनी वृद्धापकाळाचा आधार व्हावा ही प्रत्येक मातापित्याची अपेक्षा ...

आकाश नेवे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आयुष्यभर आपल्या मुलांसाठी राबल्यानंतर त्यांनी वृद्धापकाळाचा आधार व्हावा ही प्रत्येक मातापित्याची अपेक्षा असते. मात्र या नात्याला अंतर देणारी दुर्दैवी घटना नुकतीच ममुराबाद शिवारात उघड झाली आहे. एका ८२ वर्षीय वृद्धाला त्यांच्याच मुलांनी ममुराबादच्या शेतशिवारात सोडून दिले. सेवाधर्म परिवारातील सदस्यांनी या वृद्धाला निवारा केंद्रात दाखल केले. मात्र आजारपणामुळे त्यांना परत डाॅ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सेवाधर्म परिवाराचे सदस्य चंद्रशेखर नेवे हे शेतीच्या कामानिमित्त ममुराबादकडे गेले होते. तेथून परत येत असतानाच त्यांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपांमध्ये सीताराम हे पडलेले दिसले. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वृद्धाला मराठी कळते, हिंदी अस्पष्ट का होईना; पण बोलता येते. त्यामुळे त्यांनी हिंदीत संवाद साधला. या वृद्धाच्या जेवणाची त्यांनी व्यवस्था केली. त्यानंतर सेवाधर्म परिवारातील सदस्य दीपेश फिरके यांच्या मदतीने त्या वृद्धाला शहरातील बेघर निवारा केंद्रात आणले. तेथे त्यांना दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना नवा ड्रेस देत अंघोळ घालण्यात आली. सुरुवातीला सेवाधर्म परिवारातील सदस्यांना हा वृद्ध मनोरुग्ण असेल असे वाटले होते. मात्र त्यांची मानसिक स्थिती नीट असल्याचे लक्षात आले. त्यांना नाव विचारले मात्र त्यांनी स्पष्टपणे कधीही ते सांगितले नाही. आपल्याला जंगलात सोडले म्हणून मुलांवर कारवाई होईल, या भीतीपोटी त्या ‘बापा’ने आपले किंवा मुलांचे कुणाचेही नाव सांगितले नाही. त्यांच्या अंगावर सीताराम चिंधी असे गोंदलेले होते. त्यामुळे बेघर निवारा केंद्रात दाखल करतांना त्यांचे नाव सीताराम चिंधी असेच लिहिण्यात आले.

निवारा केंद्रातून रुग्णालयात दाखल

सीताराम यांना मूळव्याधीचा त्रास आहे. त्यांना दाखल केल्यावर दुसऱ्याच दिवशी सेवाधर्मच्या सदस्यांना केंद्रातून फोन आला. सीताराम यांना रुग्णालयात दाखल करण्यास आणि ते पूर्ण बरे होईपर्यंत तेथेच ठेवण्यास सांगण्यात आले. सेवाधर्म परिवारातील चंद्रशेखर नेवे आणि दीपाली कासार यांनी तातडीने हालचाली करून त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.

सीताराम म्हणतात, ‘सब मंगल है’

सीताराम यांना झाडाझुडुपांमध्ये असतानाही ते सब मंगल है असेच म्हणत होते. त्यानंतर निवारा केंद्रात त्यांना नवीन कपडे देण्यात आले. तेथेही ते आनंदी दिसत होते. त्यांना आयुष्याच्या या टप्प्यावर कोणत्याही अडचणींचा सामना करताना कसलेही दु:ख होत नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे.

केंद्रात दाखल असलेल्या सर्वांच्या उपचाराची व्यवस्था जिल्हा रुग्णालयात केली जाते. सीताराम यांना दाखल केल्यानंतर मूळव्याधीचा त्रास सुरू झाला. त्यांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या केंद्रात एक व्यवस्थापक आणि तीन काळजीवाहक आहेत.

मनीषा पारधी, व्यवस्थापक, निवारा केंद्र, जळगाव