शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

गोलाणीत पुन्हा तयार झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच तळमजल्यात नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पूर्ण मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. याच तळमजल्यात पाणी साचत असल्याने चार महिन्यांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने आंदोलन केले होते. आता महापालिकेत सत्तांत्तर होऊन सेनेची सत्ता आली असली तरी याठिकाणची समस्या कायम आहे. यामुळे आंदोलन करणाऱ्या सेनेने आता तरी या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी मार्केटमधील दुकानदारांकडून केली जात आहे.

गोलाणी मार्केटमध्ये दररोज लाखोंची उलाढाल होत असते. जिल्हाभरातून ग्राहक येथे येत असतात. मात्र, मार्केटची स्थिती पाहिल्यास हे मार्केट मोबाईल पेक्षा कचऱ्याचेच आणि घाणीचे मार्केट म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे. गोलाणी मार्केटमध्ये येणाऱ्या जवळ-जवळ सर्वच प्रवेशव्दारांसमोर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तर मार्केटच्या मागील बाजूस खराब भाजीपाला व फळे फेकली जात असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यातच आता तळमजल्यात पावसाचे व गटारीचे पाणी साचत असल्याने नागरिकांसह याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तेव्हा विरोधी होते, आता सत्तेत आल्यामुळे समस्या तरी सोडवा

तळमजल्यात गटारीचे पाणी साचण्याचा प्रकार याठिकाणी नेहमीच होत असतो. याविरोधात चार महिन्यांपूर्वी शिवसेनेने आंदोलन केले होते. कागदी बोट तयार करून, त्या बोटींना आमदार, तत्कालीन महापौर, गटनेत्यांचे नाव देत त्या बोटी साचलेल्या पाण्यात सोडण्यात आल्या होत्या. तत्कालीन सत्ताधारी भाजपला ही समस्या सोडविता आली नाही. आता महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांना या समस्येची मोठ्या प्रमाणात जाण आहे. त्यामुळे सत्ताधारी ही समस्या प्राधान्याने सोडवतील अशी अपेक्षा व्यापारी बांधवांना लागून आहे.

एकमेव शौचालय बंद केल्याने अडचण

गोलाणी मार्केटमधील स्वच्छतागृहांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. मनपा आरोग्य विभागाने या मार्केटमधील स्वच्छतागृहांकडे लक्ष देणेच बंद केले आहे. त्यातच अनेक व्यापाऱ्यांनी काही स्वच्छतागृहांना कुलूप लावून ठराविक दुकानदारांसाठीच या स्वच्छतागृहांचा वापर केला जात आहे. एकमेव स्वच्छतागृह या मार्केटमध्ये सुरु होते. मात्र, त्याठिकाणी देखील काही जणांनी कुलूप लावल्यामुळे या मार्केटमध्ये सद्य स्थितीत एकही स्वच्छतागृह शिल्लक नाही. यामुळे या मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मनपा आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.