शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

लाडाची लेक सीमेवर लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलींनाही आता ५ सप्टेंबर रोजी ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलींनाही आता ५ सप्टेंबर रोजी होणारी एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा देता येणार आहे. याबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयाचा जळगावातील एनसीसीच्या विद्यार्थिनींनी स्वागत करीत न्यायालयाचे आभार मानले आहे.

एन.डी.ए.ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर ही दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात. त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इयत्ता ११वी व १२वीचा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपरमध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय समाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डमार्फत मुलाखतीसाठी बोलावले जाते.

अशी आहे शैक्षणिक पात्रता

एनडीएमध्ये दाखल होताना उमेदवार बारावी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी बारावीत शिकत असावा अथवा बारावी उत्तीर्ण असावा. एनडीएच्या आर्मी शाखेसाठी उमेदवार बारावीच्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवाराने १२ वीला गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असावे. एनडीएमध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय- साडेसोळा ते साडेएकोणवीस दरम्यान असावे.

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार

आतापर्यंत मुलींना डिफेन्समध्ये जाण्यासाठी सीडीएस हा एकच मार्ग होता. पदवीनंतर मुलींना परीक्षा देण्याची संधी मिळत होती. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे आता मुलींना बारावीनंतर परीक्षा देता येईल. कमी वयात लष्करात भरती होऊ शकतील. त्यामुळे न्यायालयाचे आम्ही आभार मानतो.

- मोक्षदा चौधरी

००००००००००

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जाण्यासाठी पदवीनंतर मुलींना संधी मिळत होती. त्यामुळे आर्मी अधिकारी होण्यासाठी तीन ते चार वर्षे मिळत हाेती. परंतु, नुकताच न्यायालयाने एनडीएची परीक्षा मुलींनाही देता येईल, असा निर्णय दिला. हा सर्वात चांगला निर्णय आहे. यामुळे आता मुलींना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे व बारावीनंतर मुलींना लष्करात जाता येणार आहे.

- पायल महाजन

०००००००००००

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

याचिकाकर्त्या खूश कालरा यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, एनडीएची परीक्षा देता न येणे हा महिलांविरुद्ध होणार भेदभाव आहे. संविधानात स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमध्ये महिलांनाही सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर केंद्र सरकारने या याचिकेला विरोध करत म्हटलं होतं की, सैन्यात सामील होण्यासाठी फक्त एनडीए आणि एनएनई नाही. सैन्यात भरती होण्यासाठी महिलांना यूपीएससी आणि नॉन-यूपीएससीद्वारे प्रवेश दिला जातो. तसेच एनडीए कॅडेट्सना पदोन्नतीमध्ये कोणताही विशेष लाभ दिला जात नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. पण दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने महिलांना सध्या परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे.