शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लाडाची लेक सीमेवर लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलींनाही आता ५ सप्टेंबर रोजी ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलींनाही आता ५ सप्टेंबर रोजी होणारी एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा देता येणार आहे. याबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयाचा जळगावातील एनसीसीच्या विद्यार्थिनींनी स्वागत करीत न्यायालयाचे आभार मानले आहे.

एन.डी.ए.ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर ही दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात. त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इयत्ता ११वी व १२वीचा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपरमध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय समाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डमार्फत मुलाखतीसाठी बोलावले जाते.

अशी आहे शैक्षणिक पात्रता

एनडीएमध्ये दाखल होताना उमेदवार बारावी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी बारावीत शिकत असावा अथवा बारावी उत्तीर्ण असावा. एनडीएच्या आर्मी शाखेसाठी उमेदवार बारावीच्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवाराने १२ वीला गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असावे. एनडीएमध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय- साडेसोळा ते साडेएकोणवीस दरम्यान असावे.

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार

आतापर्यंत मुलींना डिफेन्समध्ये जाण्यासाठी सीडीएस हा एकच मार्ग होता. पदवीनंतर मुलींना परीक्षा देण्याची संधी मिळत होती. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे आता मुलींना बारावीनंतर परीक्षा देता येईल. कमी वयात लष्करात भरती होऊ शकतील. त्यामुळे न्यायालयाचे आम्ही आभार मानतो.

- मोक्षदा चौधरी

००००००००००

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जाण्यासाठी पदवीनंतर मुलींना संधी मिळत होती. त्यामुळे आर्मी अधिकारी होण्यासाठी तीन ते चार वर्षे मिळत हाेती. परंतु, नुकताच न्यायालयाने एनडीएची परीक्षा मुलींनाही देता येईल, असा निर्णय दिला. हा सर्वात चांगला निर्णय आहे. यामुळे आता मुलींना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे व बारावीनंतर मुलींना लष्करात जाता येणार आहे.

- पायल महाजन

०००००००००००

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

याचिकाकर्त्या खूश कालरा यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, एनडीएची परीक्षा देता न येणे हा महिलांविरुद्ध होणार भेदभाव आहे. संविधानात स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमध्ये महिलांनाही सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर केंद्र सरकारने या याचिकेला विरोध करत म्हटलं होतं की, सैन्यात सामील होण्यासाठी फक्त एनडीए आणि एनएनई नाही. सैन्यात भरती होण्यासाठी महिलांना यूपीएससी आणि नॉन-यूपीएससीद्वारे प्रवेश दिला जातो. तसेच एनडीए कॅडेट्सना पदोन्नतीमध्ये कोणताही विशेष लाभ दिला जात नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. पण दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने महिलांना सध्या परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे.