शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

लाडाची लेक सीमेवर लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलींनाही आता ५ सप्टेंबर रोजी ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलींनाही आता ५ सप्टेंबर रोजी होणारी एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा देता येणार आहे. याबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयाचा जळगावातील एनसीसीच्या विद्यार्थिनींनी स्वागत करीत न्यायालयाचे आभार मानले आहे.

एन.डी.ए.ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर ही दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात. त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इयत्ता ११वी व १२वीचा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपरमध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय समाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डमार्फत मुलाखतीसाठी बोलावले जाते.

अशी आहे शैक्षणिक पात्रता

एनडीएमध्ये दाखल होताना उमेदवार बारावी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी बारावीत शिकत असावा अथवा बारावी उत्तीर्ण असावा. एनडीएच्या आर्मी शाखेसाठी उमेदवार बारावीच्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवाराने १२ वीला गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असावे. एनडीएमध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय- साडेसोळा ते साडेएकोणवीस दरम्यान असावे.

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार

आतापर्यंत मुलींना डिफेन्समध्ये जाण्यासाठी सीडीएस हा एकच मार्ग होता. पदवीनंतर मुलींना परीक्षा देण्याची संधी मिळत होती. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे आता मुलींना बारावीनंतर परीक्षा देता येईल. कमी वयात लष्करात भरती होऊ शकतील. त्यामुळे न्यायालयाचे आम्ही आभार मानतो.

- मोक्षदा चौधरी

००००००००००

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जाण्यासाठी पदवीनंतर मुलींना संधी मिळत होती. त्यामुळे आर्मी अधिकारी होण्यासाठी तीन ते चार वर्षे मिळत हाेती. परंतु, नुकताच न्यायालयाने एनडीएची परीक्षा मुलींनाही देता येईल, असा निर्णय दिला. हा सर्वात चांगला निर्णय आहे. यामुळे आता मुलींना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे व बारावीनंतर मुलींना लष्करात जाता येणार आहे.

- पायल महाजन

०००००००००००

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

याचिकाकर्त्या खूश कालरा यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, एनडीएची परीक्षा देता न येणे हा महिलांविरुद्ध होणार भेदभाव आहे. संविधानात स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमध्ये महिलांनाही सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर केंद्र सरकारने या याचिकेला विरोध करत म्हटलं होतं की, सैन्यात सामील होण्यासाठी फक्त एनडीए आणि एनएनई नाही. सैन्यात भरती होण्यासाठी महिलांना यूपीएससी आणि नॉन-यूपीएससीद्वारे प्रवेश दिला जातो. तसेच एनडीए कॅडेट्सना पदोन्नतीमध्ये कोणताही विशेष लाभ दिला जात नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. पण दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने महिलांना सध्या परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे.