शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

अनेक सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

वरणगाव : येथील रेल्वे स्टेशनच्या पलीकडील सिद्धेश्वर नगरची निर्मिती होऊन सुमारे ३५ वर्षे झाली. परंतु आजतागायत येथील नागरिक ...

वरणगाव : येथील रेल्वे स्टेशनच्या पलीकडील सिद्धेश्वर नगरची निर्मिती होऊन सुमारे ३५ वर्षे झाली. परंतु आजतागायत येथील नागरिक विविध सुविधांपासून वंचित आहेत. या भागातील नागरिकांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रामुख्याने सिद्धेश्वरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे पुलाखाली नेहमी चिखल व गुडघ्याच्या वर पाणी साचलेले असते. त्या चिखलसदृश पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते. त्यामुळे तेथे वाहने रुतून लहान-मोठे अपघात होणे नित्याचेच झाले आहे. तसेच पुलाखालील चिखल आणि पाण्याच्या प्रमुख समस्येसह घरकुलांची समस्याही आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या, रेशन कार्डची समस्या, रस्त्याची समस्या यासारखे अनेक प्रश्न या भागातील नागरिकांना भेडसावत आहे.

या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासााठी महिला मंडळ सिद्धेश्वर नगरच्या वतीने वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देण्यात आले. यावर त्वरित विचार करून १५ दिवसांच्या आत काम चालू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. पत्रकावर महाराष्ट्र रक्षक सेना अध्यक्षा सविता माळी, सेनेचे विभाग प्रमुख उमाकांत झांबरे यांच्यासह सिद्धेश्वर नगरमधील नागरिकांच्या सह्या आहेत. मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देताना सिद्धेश्वर नगरच्या महिला व पुरुष नागरिक. (छाया : बाळू चव्हाण)