शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव - औरंगाबाद महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:20 IST

जळगाव : जळगाव - औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रस्ता भरावासाठी टाकलेली माती पावसाने वर आली असल्यामुळे ...

जळगाव : जळगाव - औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रस्ता भरावासाठी टाकलेली माती पावसाने वर आली असल्यामुळे येथे जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व चिखलाने वाहन घसरून अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड चिखल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने जळगाव - औरंगाबाद रस्त्याची शनिवारी पाहणी केली. त्यात जळगाव-औरंगाबाद महामार्गाची गेल्या काही महिन्यांपूर्वी अत्यंत दुर्दशा झाली होती. नंतर या महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, महामार्गावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे आता पुन्हा जागोजागी खड्डे पडल्याचे पहायला मिळाले. अजिंठा चौफुली तसेच काशीनाथ चौकात भला मोठा खड्डा पडलेला पहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमधून वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे, त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत आहेत.

वाहनचालकांना डोकेदुखी

दरम्यान, जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हे काम अर्धवट आहे. परिणामी, रस्ता भरावासाठी वापरलेली माती ही रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. एवढेच नव्हे तर कृषी उत्पन्न बाजार समिती ते रेमंड चौफुलीपर्यंतचा रस्ता प्रचंड चिखलमय झालेला आहे. याठिकाणी अनेक दुचाकीस्वार चिखलमय रस्त्यामुळे पडण्याच्या घटनादेखील घडत आहेत, तर महामार्गावर काही ठिकाणी रस्त्याची एक बाजू बंद असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडीदेखील होत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

रस्त्याच्या कडेला भरतो बाजार

काशीनाथ चौकातील रस्ता हा उंच व सखल झाला असून, प्रचंड चिखल झालेला आहे. दुसरीकडे रस्त्याच्या एका बाजूला बाजार भरत असल्यामुळे त्या बाजूने वाहतुकीची कोंडी होत असल्याचा प्रकार घडत आहे. काही वाहनचालकांकडून रस्त्यावरच वाहने लावली जात होती. त्यामुळे मोठ्या वाहनांना महामार्गावरून वाट काढताना अडचणी येत होत्या. दरम्यान, हे नित्याचेच झाले असल्याचे एका हॉटेलचालकाने सांगितले.

अपघाताच्या भीतीने दुचाकी नेली ढकलत

शनिवारी सायंकाळीसुद्धा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रचंड चिखल झाला होता. या रस्त्यावर अक्षरश: वाहने घसरत होती. अपघाताच्या भीतीने एक तरुण हा दुचाकी ढकलत घेऊन जात असल्याचे पहायला मिळाले. या रस्त्यावर प्रवास करताना खूप वेळ वाया जात आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.