शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव - औरंगाबाद महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:20 IST

जळगाव : जळगाव - औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रस्ता भरावासाठी टाकलेली माती पावसाने वर आली असल्यामुळे ...

जळगाव : जळगाव - औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रस्ता भरावासाठी टाकलेली माती पावसाने वर आली असल्यामुळे येथे जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व चिखलाने वाहन घसरून अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड चिखल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने जळगाव - औरंगाबाद रस्त्याची शनिवारी पाहणी केली. त्यात जळगाव-औरंगाबाद महामार्गाची गेल्या काही महिन्यांपूर्वी अत्यंत दुर्दशा झाली होती. नंतर या महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, महामार्गावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे आता पुन्हा जागोजागी खड्डे पडल्याचे पहायला मिळाले. अजिंठा चौफुली तसेच काशीनाथ चौकात भला मोठा खड्डा पडलेला पहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमधून वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे, त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत आहेत.

वाहनचालकांना डोकेदुखी

दरम्यान, जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हे काम अर्धवट आहे. परिणामी, रस्ता भरावासाठी वापरलेली माती ही रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. एवढेच नव्हे तर कृषी उत्पन्न बाजार समिती ते रेमंड चौफुलीपर्यंतचा रस्ता प्रचंड चिखलमय झालेला आहे. याठिकाणी अनेक दुचाकीस्वार चिखलमय रस्त्यामुळे पडण्याच्या घटनादेखील घडत आहेत, तर महामार्गावर काही ठिकाणी रस्त्याची एक बाजू बंद असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडीदेखील होत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

रस्त्याच्या कडेला भरतो बाजार

काशीनाथ चौकातील रस्ता हा उंच व सखल झाला असून, प्रचंड चिखल झालेला आहे. दुसरीकडे रस्त्याच्या एका बाजूला बाजार भरत असल्यामुळे त्या बाजूने वाहतुकीची कोंडी होत असल्याचा प्रकार घडत आहे. काही वाहनचालकांकडून रस्त्यावरच वाहने लावली जात होती. त्यामुळे मोठ्या वाहनांना महामार्गावरून वाट काढताना अडचणी येत होत्या. दरम्यान, हे नित्याचेच झाले असल्याचे एका हॉटेलचालकाने सांगितले.

अपघाताच्या भीतीने दुचाकी नेली ढकलत

शनिवारी सायंकाळीसुद्धा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रचंड चिखल झाला होता. या रस्त्यावर अक्षरश: वाहने घसरत होती. अपघाताच्या भीतीने एक तरुण हा दुचाकी ढकलत घेऊन जात असल्याचे पहायला मिळाले. या रस्त्यावर प्रवास करताना खूप वेळ वाया जात आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.