शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

विविध धर्म-मतांचा खानदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 13:32 IST

जगभराच्या इतिहासाचे अवलोकन करू जाते.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17 - खानदेशात जैन धर्माच्या प्रभावाच्या अनेक खुणा वाचता येतात. राजाच्या प्रभावामुळे वेळोवेळी जनतेवर त्या त्या धर्ममतांचा प्रभाव जगभर पडलेला दिसून येतो.  वाकाटक राजाने हिंदू धर्मासोबत बौद्ध धर्माला राजाश्रय दिल्यामुळे बौद्ध धर्माच्या प्रचार- प्रसाराची नांदीही येथे आढळते. जगभराच्या इतिहासाचे अवलोकन करू जाते. हे तथ्य ठळकपणे दृष्टोत्पत्तीस येते की, सर्वत्र राजसत्तेने जनतेवर धर्माची जबरदस्ती केली आहे. राजसत्तांचे पतन झाल्यावर त्या विशिष्ट धर्ममतांची पिछेहाट जगाने अनुभवली आहे.खानदेशात नाशिकजवळ चंदनपूर येथे जैन धर्माचा मठ होता. येथील अमोघ जैन मठासाठी राष्ट्रकूट राजे उपस्थित राहात असत. जैन धर्मीय श्वेतांबर पंथाचा प्रभाव कळवणच्या परिसरात होता. कळवणनजीकचे कालकालेश्वर हे जैन तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याचे अकराव्या शतकातील ताम्रपटातील तपशील सांगतो. येथील देवालयातील काही धार्मिक विधी करण्यासाठी जैन भिक्षुला तत्कालीन भोजदेव राजाने भूमी दान केल्याची नोंद आहे. मांगीतुंगीचे जैन क्षेत्र या गोष्टीचा पाठपुरावा करते. बळसाणा येथील जैन तीर्थाचे प्राचीनत्त्व इतिहाससिद्धच आहे. यादववंशीय सेऊणदेव राजानेही त्रिंबकजवळील अंजनेर येथील आठवे र्तीथकर चंद्रप्रभू यांच्या मंदिर व पूजा व्यवस्थेसाठी भूमी आणि वास्तू दान केल्याचे उल्लेख आढळतात. प्राचीन खानदेशात बौद्ध प्रमाणेच जैन धर्माचाही प्रसार झाला होता. जैन धर्मगुरू अम्मादेव यांच्या शिकवणुकीमुळे खानदेशातील अनेक हिंदूंनी जैन धर्म स्वीकारल्याचा उल्लेख आढळतो.आठव्या आणि नवव्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या राजवटीत खानदेशात जैन व वैदिक धर्माना  राजाश्रय मिळाला होता. राजा इंद्र तिसरा हा जैन धर्मोपासक असल्यामुळे याने जैन मठ आणि मंदिरांसाठी खानदेशातील काही गावे दानात दिल्याचा पुरावा हाताशी लागतो.खानदेशातील सातव्या शतकातील निकुंभ राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. अल्लशक्ती या राजाने पिंपळनेर जवळची काही भूमी दान केल्याचा उल्लेख कासारे येथे सापडलेल्या ताम्रपटात आहे. स्थलीनगर अर्थात थाळनेर भागातील काही जमीन कुंभकर्णवंशीय भानुषेण राजाने नागवसू नामक यजुव्रेदिय ज्ञानसाधकाला दिल्याचा पुरावा मिळतो. माता आणि देवता यावर समान विश्वास बाळगण्यावर या काळात भर दिसतो. भानुषेण राजाने अमळनेरजवळ बोरी नदीच्या काठावरील टाकरखेड येथील काही भूमी दान केल्याचा उल्लेख आहे. बळसाणे येथील मंदिरातल्या शिलालेखाच्या आधारे असे म्हणता येते की, निकुंभवंशीय राजा कृष्णा याने विद्वानांचा आदर केला होता. बहलापुरी बहाळ आणि देवगाव या आताच्या जळगाव जिल्ह्यातील गावांचे दान तत्कालीन वेदज्ञ नागशर्मनला केल्याचा पुरावा ताम्रपटातून मिळतो.सातपुडय़ाच्या प्रवेशद्वाराशीच नागाजरुनाची मूर्ती आहे, अतिशय सुबक अशी ही मूर्ती आहे. धडगाव मोलगी मार्गावर एक अतिशय सुंदर शिल्प आहे. बुधकौशिक ऋषी कृत श्री रामरक्षा स्तोत्रात वर्णिलेल्या ‘वामांकारुढा सीता’ अशा सीतारामाची मूर्ती इथे आहे. ही पितळी व नयनरम्य मूर्ती अजूनही संशोधकांची वाट बघत आहे. सातपुडय़ात दिवाळीच्या दरम्यान अश्वत्थाम्याची मोठी साहसपूर्ण यात्रा सुरू असते. अजूनही आपल्या जखमांसाठी तेल- चिंध्यांचे दान मागत हिंडणारा चिरंजीवी अश्वत्थामा लोकमानसात दृढ आहे. तो शाप भोगत या परिसरात-सातपुडय़ाच्या द:या खो:यांमधून भटकतोय, असे मानले जाते. पंधराव्या शतकात पिरानापंथ किंवा इमादशाहीज पंथाची स्थापना झाली. यालाच सतपंथ म्हणून ओळखले जाते. संत सैयद महम्मदशाह या शाखेचे संस्थापक होते. बहादरपूर आणि ब:हाणपूर ही या संप्रदायाची पवित्र स्थळे होत. गुजरातप्रमाणेच खानदेशातही या पंथाला अनेक हिंदू- मुस्लिम अनुयायांची साथ लाभली. हा पंथ हिंदू-मुसलमानांमध्ये सारखाच मान्यताप्राप्त होता. शहादा तालुक्यातील पाडळदा येथील मुरली मनोहराची अष्टभुजा मूर्ती शिल्प आणि सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय मनोहर अशी आहे. खांडरागड नावाचे एक अतिप्राचीन स्थळ चोपडय़ाच्या (चंपानगरी) जवळ दर्शवले जाते. अशीरगड येथे द्रोणपुत्र अश्वत्थामाचे मंदिर आहे. खानदेशच्या या वैभवशाली परंपरेत संतांची मांदियाळी फुलली आहे. या संत-भक्तांनी आपापल्या ज्ञानसाधनेने भगवंताची आराधना केली. र्सवकष मानवी हिताचा विचार मांडला आहे. - प्रा.डॉ. विश्वास पाटील