शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

यंदा उन्हाळ्यात खान्देश राहणार ‘भारनियमन मुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

दरवर्षी उन्हा‌ळा सुरू होताच, नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. या दिवसात विजेची मागणी दुप्पटीने वाढत असल्यामुळे, विजेचा तुटवडा ...

दरवर्षी उन्हा‌ळा सुरू होताच, नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. या दिवसात विजेची मागणी दुप्पटीने वाढत असल्यामुळे, विजेचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळेस शहरासह ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महावितरणतर्फे विविध खासगी व सरकारी कंपन्यांतर्फे विजेची खरेदी करण्यात येत आहे. तसेच मुबलक कोळसा व पाण्याचींही उपलब्ध असल्यामुळे राज्यातील विविध औष्णिक प्रकल्पांमध्येही विजेची निर्मिती होत आहे. त्यामुळे यंदा एप्रिल व मे महिन्यात विजेची मागणी वाढली तरी, ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्यासाठी महावितरणने जानेवारी महिन्यापासून सर्व प्रकारचे नियोजन केले आहे.

इन्फो :

दिवसाला सतराशे मेगावॅटपर्यंत विजेची मागणी

महावितरणच्या जळगाव परिमंडळात येणाऱ्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून दिवसाला एकूण सरासरी दीड हजार ते सतराशे मेगावॅटपर्यंत विजेची मागणी असते. यामध्ये घरगुती, औद्योगिक कृषी व इतर सर्व ग्राहकांचा समावेश असतो. तर उन्हाळ्यात वातानुकूलित उपकरणांचा वापर जास्त होत असल्यामुळे दिवसाला अतिरिक्त २०० ते ३०० मेगावॅटपर्यंत.

विजेची मागणी जास्त राहत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी, विजेची मागणी वाढलेली दिसून येत नाही. या पुढच्या काळात विजेची मागणी वाढली तरी, मुबलक वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सक्षम आहे. त्यामुळे खान्देशात यंदाच्या उन्हाळ्यात कुठेही भारनियमन होणार नाही. मात्र, नागरिकांनी थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण