शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जळगावकरांना तर सुविधा देत येत नाही, आम्हाला काय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरालगत असलेली पाच गावे मनपा हद्दीत करण्याचा ठराव केल्यानंतर आता पाचही गावांमधून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरालगत असलेली पाच गावे मनपा हद्दीत करण्याचा ठराव केल्यानंतर आता पाचही गावांमधून मनपा सत्ताधाऱ्यांनी केलेला निर्णयाला विरोध होत आहे. जळगावकरांना सुविधा मिळत नसून, त्यापासून नागरिक वंचित आहेत. अशा परिरस्थितीत हद्दवाढ झाल्यानंतर आमच्या गावाला सुविधा मिळणे कठीण होवून जाईल. त्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहराचा विकास करून घ्यावा, आमच्या गावाचा हद्दवाढीबाबत मनपाने विचार करू नये. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास आम्ही करून घेवू असे मत मण्यारखेडा येथील ग्रामस्थांनी व्यक्त करत हद्दवाढीचा विरोध केला आहे.

मण्यारखेडा हे गाव लहानसे असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास चांगल्या प्रकारे होत आहे. तसेच नागरिकांना कोणत्याही तक्रारी असल्या तरी त्या गावातल्या गावातच सोडविल्या जातात. आमच्या गावाचा समावेश जर मनपा हद्दीत करण्यात आला. तर लहानातल्या लहान समस्येसाठी देखील नागरिकांना जळगाव शहरात येवून महानगरपालिकेत जावे लागेल. यासह ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाकडून गावाचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी मिळत आहे. महानगरपालिकेत गावाचा समावेश झाला तर नागरिकांना विकासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करावा, अन्यथा ग्रामस्थांना मनपा विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा मण्यारखेडा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

कोट...

मण्यारखेडा येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या कारभारापासून कोणत्याही तक्रारी नाहीत. गावाचा विकास चांगल्याप्रकारे होत असून, नागरिकांना मुलभुत सुविधा देखील मिळत आहेत. त्यामुळे मनपा हद्दवाढीला आमचा विरोध आहे.

-शालूबाई पाटील, सरपंच, मण्यारखेडा

जळगावमध्ये धुळीची मोठ्या समस्या अनेक वर्षांपासून आहे. ही समस्या अजूनही मनपाला सोडविता आली नाही. अनेक भागात गटारी नाहीत, रस्ते नाहीत. अशा परिस्थितीत महापालिका आमच्या गावात काय विकास करेल ? त्यापेक्षा आमची ग्रामपंचायतच सक्षम आहे.

-भगवान पाटील, उपसरपंच, मण्यारखेडा

आमचा मनपा हद्दीत जाण्यास विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचे गाव मनपाच्या हद्दीत जावू देणार नाही. याविरोधात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव केला जाणार आहे.

-संदीप अहिरे, ग्रा.पं.सदस्य

मनपा प्रशासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे शहरात सुविधा मिळत नाही. आमच्या गावात सर्वसामान्य नागरिकांना दररोज पाणी मिळत आहे. गटारी चांगल्या आहेत, रस्ते आहेत. अशा परिस्थितीत मनपात जावून गावाचा विकास थांबून जाईल.

-नामदेव पाटील, ग्रा.पं,सदस्य