शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकरांना तर सुविधा देत येत नाही, आम्हाला काय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरालगत असलेली पाच गावे मनपा हद्दीत करण्याचा ठराव केल्यानंतर आता पाचही गावांमधून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरालगत असलेली पाच गावे मनपा हद्दीत करण्याचा ठराव केल्यानंतर आता पाचही गावांमधून मनपा सत्ताधाऱ्यांनी केलेला निर्णयाला विरोध होत आहे. जळगावकरांना सुविधा मिळत नसून, त्यापासून नागरिक वंचित आहेत. अशा परिरस्थितीत हद्दवाढ झाल्यानंतर आमच्या गावाला सुविधा मिळणे कठीण होवून जाईल. त्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहराचा विकास करून घ्यावा, आमच्या गावाचा हद्दवाढीबाबत मनपाने विचार करू नये. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास आम्ही करून घेवू असे मत मण्यारखेडा येथील ग्रामस्थांनी व्यक्त करत हद्दवाढीचा विरोध केला आहे.

मण्यारखेडा हे गाव लहानसे असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास चांगल्या प्रकारे होत आहे. तसेच नागरिकांना कोणत्याही तक्रारी असल्या तरी त्या गावातल्या गावातच सोडविल्या जातात. आमच्या गावाचा समावेश जर मनपा हद्दीत करण्यात आला. तर लहानातल्या लहान समस्येसाठी देखील नागरिकांना जळगाव शहरात येवून महानगरपालिकेत जावे लागेल. यासह ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाकडून गावाचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी मिळत आहे. महानगरपालिकेत गावाचा समावेश झाला तर नागरिकांना विकासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करावा, अन्यथा ग्रामस्थांना मनपा विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा मण्यारखेडा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

कोट...

मण्यारखेडा येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या कारभारापासून कोणत्याही तक्रारी नाहीत. गावाचा विकास चांगल्याप्रकारे होत असून, नागरिकांना मुलभुत सुविधा देखील मिळत आहेत. त्यामुळे मनपा हद्दवाढीला आमचा विरोध आहे.

-शालूबाई पाटील, सरपंच, मण्यारखेडा

जळगावमध्ये धुळीची मोठ्या समस्या अनेक वर्षांपासून आहे. ही समस्या अजूनही मनपाला सोडविता आली नाही. अनेक भागात गटारी नाहीत, रस्ते नाहीत. अशा परिस्थितीत महापालिका आमच्या गावात काय विकास करेल ? त्यापेक्षा आमची ग्रामपंचायतच सक्षम आहे.

-भगवान पाटील, उपसरपंच, मण्यारखेडा

आमचा मनपा हद्दीत जाण्यास विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचे गाव मनपाच्या हद्दीत जावू देणार नाही. याविरोधात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव केला जाणार आहे.

-संदीप अहिरे, ग्रा.पं.सदस्य

मनपा प्रशासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे शहरात सुविधा मिळत नाही. आमच्या गावात सर्वसामान्य नागरिकांना दररोज पाणी मिळत आहे. गटारी चांगल्या आहेत, रस्ते आहेत. अशा परिस्थितीत मनपात जावून गावाचा विकास थांबून जाईल.

-नामदेव पाटील, ग्रा.पं,सदस्य