शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

जळगावकरांवर पावसाचा रुसवा कायम

By विलास.बारी | Updated: August 29, 2017 18:03 IST

जिल्ह्यात तीन महिन्यांनंतरही केवळ 56 टक्के पाऊस. नाशिकमधील पजर्न्यवृष्टीमुळे गिरणा धरणात 55.64 टक्के जलसंचय

ठळक मुद्देमध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसाठा तर लघुप्रकल्पात ठणठणाटगेल्या वर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात 10 टक्के पाऊस कमीहवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर बळीराजाच्या आशा पल्लवित.विहिरींमधील जलसाठा वाढीसाठी अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता

विलास बारी / ऑनलाईन लोकमतजळगाव, दि.29 - हवामान विभागाने पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने कहर केला असताना  तीन महिने उलटल्यानंतरही जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 56 टक्के पाऊस झाल्याने जळगावकरांवर पावसाचा रुसवा कायम आहे. जिल्ह्यातील 8 लघु प्रकल्पांमध्ये अजूनही 50 टक्क्यांच्या आत जलसाठा आहे.हवामान विभागाने सर्वत पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. तर अन्य ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

तीन महिन्यात सरासरीच्या 56 टक्के पाऊसजळगाव जिल्ह्यात पावसाळ्यात वार्षिक सरासरी पजर्न्यमान हे 663.3 टक्के होत असतो. मात्र तीन महिन्यांचा कालावधी झाला असताना आतार्पयत केवळ  370.7 मिमी पाऊस झालेला आहे. सरासरीच्या केवळ 56 टक्के पाऊस आतार्पयत झालेला आहे. यात सर्वाधिक 70.7 मिमी पाऊस हा पारोळा तालुक्यात तर सर्वात कमी 37 मिमी पाऊस हा अमळनेर तालुक्यात झालेला आहे.

नाशिकमधील पजर्न्यवृष्टीचा गिरणेला लाभकाही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने त्याचा लाभ गिरणा धरणाला होत आहे. त्यामुळे 29 ऑगस्टर्पयत या धरणात 55.64 टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट अखेर या धरणात 67.30 टक्के जलसाठा होता. यावर्षी वाघूर धरणात 64.47 टक्के तर हतनूर धरणात 66.12 टक्के जलसाठा आहे.8 लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाटपावसाळ्याचे तीन महिने उलटल्यानंतरही जळगाव जिल्ह्यातील 8 लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. त्यात अग्नावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी व मन्याड या प्रकल्पांमध्ये अजूनही शून्य टक्के जलसाठा आहे. तर अंजनी 3.62 टक्के, गुळ धरण 35.26 टक्के, मोर धरणात 49.17 टक्के जलसाठा आहे. अभोरा, सुकी, तोंडापूर धरणात 50 टक्क्यांच्या वर जलसाठा आहे. तर मंगरुळ हा एकमेव लघुप्रकल्प 100 टक्के भरलेला आहे.

10 टक्के पाऊस घटलागेल्यावर्षी 29 ऑगस्टर्पयत जिल्हाभरात 67.5 टक्के पाऊस झाला होता. या कालावधीत सरासरीच्या 446.9 मिमी पाऊस झालेला होता. मात्र यावर्षी त्यात तब्बल 10 टक्के घट झाली आहे. यावर्षी सरासरीच्या 370.7 मिमी पाऊस झाला असून केवळ 56 टक्के पाऊस झाला आहे. काही ठराविक अंतराने पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अजूनही विहिरींमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. मध्यम व लघुप्रकल्पांत पाणी नसल्याने अनेक गावांमध्ये भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवत आहे.