शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

जळगावकरांवर पावसाचा रुसवा कायम

By विलास.बारी | Updated: August 29, 2017 18:03 IST

जिल्ह्यात तीन महिन्यांनंतरही केवळ 56 टक्के पाऊस. नाशिकमधील पजर्न्यवृष्टीमुळे गिरणा धरणात 55.64 टक्के जलसंचय

ठळक मुद्देमध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसाठा तर लघुप्रकल्पात ठणठणाटगेल्या वर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात 10 टक्के पाऊस कमीहवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर बळीराजाच्या आशा पल्लवित.विहिरींमधील जलसाठा वाढीसाठी अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता

विलास बारी / ऑनलाईन लोकमतजळगाव, दि.29 - हवामान विभागाने पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने कहर केला असताना  तीन महिने उलटल्यानंतरही जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 56 टक्के पाऊस झाल्याने जळगावकरांवर पावसाचा रुसवा कायम आहे. जिल्ह्यातील 8 लघु प्रकल्पांमध्ये अजूनही 50 टक्क्यांच्या आत जलसाठा आहे.हवामान विभागाने सर्वत पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. तर अन्य ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

तीन महिन्यात सरासरीच्या 56 टक्के पाऊसजळगाव जिल्ह्यात पावसाळ्यात वार्षिक सरासरी पजर्न्यमान हे 663.3 टक्के होत असतो. मात्र तीन महिन्यांचा कालावधी झाला असताना आतार्पयत केवळ  370.7 मिमी पाऊस झालेला आहे. सरासरीच्या केवळ 56 टक्के पाऊस आतार्पयत झालेला आहे. यात सर्वाधिक 70.7 मिमी पाऊस हा पारोळा तालुक्यात तर सर्वात कमी 37 मिमी पाऊस हा अमळनेर तालुक्यात झालेला आहे.

नाशिकमधील पजर्न्यवृष्टीचा गिरणेला लाभकाही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने त्याचा लाभ गिरणा धरणाला होत आहे. त्यामुळे 29 ऑगस्टर्पयत या धरणात 55.64 टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट अखेर या धरणात 67.30 टक्के जलसाठा होता. यावर्षी वाघूर धरणात 64.47 टक्के तर हतनूर धरणात 66.12 टक्के जलसाठा आहे.8 लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाटपावसाळ्याचे तीन महिने उलटल्यानंतरही जळगाव जिल्ह्यातील 8 लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. त्यात अग्नावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी व मन्याड या प्रकल्पांमध्ये अजूनही शून्य टक्के जलसाठा आहे. तर अंजनी 3.62 टक्के, गुळ धरण 35.26 टक्के, मोर धरणात 49.17 टक्के जलसाठा आहे. अभोरा, सुकी, तोंडापूर धरणात 50 टक्क्यांच्या वर जलसाठा आहे. तर मंगरुळ हा एकमेव लघुप्रकल्प 100 टक्के भरलेला आहे.

10 टक्के पाऊस घटलागेल्यावर्षी 29 ऑगस्टर्पयत जिल्हाभरात 67.5 टक्के पाऊस झाला होता. या कालावधीत सरासरीच्या 446.9 मिमी पाऊस झालेला होता. मात्र यावर्षी त्यात तब्बल 10 टक्के घट झाली आहे. यावर्षी सरासरीच्या 370.7 मिमी पाऊस झाला असून केवळ 56 टक्के पाऊस झाला आहे. काही ठराविक अंतराने पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अजूनही विहिरींमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. मध्यम व लघुप्रकल्पांत पाणी नसल्याने अनेक गावांमध्ये भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवत आहे.