शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

जळगाव बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची 40 टक्के आवक घटली

By admin | Updated: June 1, 2017 16:08 IST

लिलाव झाला : दुस:या दिवसापासून जाणवणार परिणाम

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.1 - कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी शेतक:यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्यात दिवशी जळगावात येणा:या भाजीपाला, फळ, धान्य यांच्या आवकवर परिणाम ही आवक 40 टक्क्याने घटली आहे. आज संपामुळे भाजीपाला काढला  जाणार नसल्याने शुक्रवारपासून याचा अधिक परिणाम जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आज आलेल्या 60 टक्के मालाचा पूर्णपणे, शांततेत लिलाव झाला व बाजार समितीतील कामकाज सुरळीत सुरू होते. 
पहिल्यात दिवशी 40 टक्के आवक घटली
संपाच्या पहिल्याच दिवशी जळगाव बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळ, धान्य यांची 40 टक्क्याने आवक घटली. संपाच्या पाश्र्वभूमीवर राज्यात इतर भागात तोडफोड होऊ लागल्याने भाजीपाल्याची अनेक वाहने जळगावात आलीच नाही. त्यामुळे केवळ 60 टक्के आवक राहिली. 
भाववाढ
आवक कमी होताच बाजार समितीपासून भाववाढ होण्यास सुरुवात झाली. दररोजच्या लिलावापेक्षा 10 टक्क्याने भाव वाढ झाल्याचे सांगण्यात आले. 
माल घेण्यासाठी झुंबड
आवक घटल्याने किरकोळ विक्रेत्यांनी माल खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सर्व प्रकारचा भाजीपाला आपल्याला मिळाला पाहिजे, यासाठी सर्वच ठिकाणी झुंबड पडताना दिसून आली. 
लिलाव सुरळीत
जेवढा माल आला त्याचा पूर्णपणे शांततेत लिलाव झाला. यामध्ये कोणतीही अडचण आली नाही. सकाळर्पयत चालणारा भाजीपाल्याचा लिलाव झाल्यानंतर कांदे, बटाटे यांचाही लिलाव सुरळीत झाला. 
धान्याचीही आवक सुरू
बाजार समितीतील धान्य बाजारावरही परिणाम होऊन त्याचीही आवक 40 टक्क्याने घटली. मात्र इतर शेतकरी आणत असल्याने  काही प्रमाणात आवक सुरू होती.