शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

जळगावच्या केळीला क्लस्टरमधून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नगदी फळपिकांची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवून निर्यातीला चालना देण्यासाठी, केंद्र शासनाकडून राबविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नगदी फळपिकांची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवून निर्यातीला चालना देण्यासाठी, केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या फलोत्पादन क्षेत्र विकास योजना म्हणजेच व्हर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या योजनेत जळगाव जिल्ह्यातील केळ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. ३१ मे रोजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या योजनेचे उद्घाटन केले. मात्र, या योजनेत जळगाव जिल्ह्यातील केळ्यांचा समावेश न करता, आंध्रप्रदेश व तामिळनाडू या राज्यांमधील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा फटका असून, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी या निर्णयामुळे निराश झाले आहेत. या योजनेमध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर, तर तामिळनाडूमधील थेनी या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांच्या तोडीस तोड उत्पादन जळगाव जिल्ह्यातदेखील केले जाते. तसेच जळगाव जिल्ह्यातील केळ्यांची निर्यात अरब राष्ट्रापासून ते युरोपापर्यंत केली जात असताना केंद्रीय कृषी विभागाने जिल्ह्यातील केळ्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

जळगाव जिल्हा केळ्यांचा मोठा पुरवठादार

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर केळ्यांची लागवड होते. विशेष म्हणजे केवळ रावेर, चोपडा, यावल व जळगाव जिल्ह्यातील गिरणा काठच्या भागात केळ्यांची लागवड होत असते. जळगाव जिल्ह्यातील केळी संपूर्ण भारतात प्रसिद्ध असून, जम्मू - काश्मीरपासून ते सिक्कीमपर्यंत, इराणपासून ते कुवेतपर्यंत केळ्यांची निर्यातही केली जात असते. मात्र, केंद्र शासनाने व्हर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपिंग प्रोग्राममध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश न केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

काय आहे व्हर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम ?

केंद्र शासनाच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी वेगवेगळ्या फळपिकांसाठी देशात ५३ फलोत्पादन क्षेत्र शोधले आहेत. त्यात केळ्यांसाठी जळगाव जिल्ह्याची निवड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. या क्लस्टर विकास कार्यक्रमामुळे कृषी क्षेत्रात सुमारे दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. दहा लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. नगदी फळपिकांची आयात कमी करणे आणि देशांतर्गत उत्पादन वाढवून निर्यातीला प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

कोट..

जळगाव जिल्ह्यातील केळी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. अनेक देशांकडून जिल्ह्यातील केळ्यांना मागणी आहे. तसेच ही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन फलोत्पादन क्षेत्र विकास योजनेत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश केला जावा, यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. पुढील टप्प्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

- रक्षा खडसे, खासदार

केळींची होत असलेली लागवड

अनंतपूर - १ लाख १२ हजार हेक्टर

जळगाव - १ लाख २ हजार हेक्टर

थेनी - ८८ हजार हेक्टर