शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

वॉटरग्रेसचा विषय आता पदाधिकाऱ्यांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याचा कोणताही पुरावा मनपाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याचा कोणताही पुरावा मनपाकडे नाही. तसेच उच्च न्यायालयातील मनपाच्या वकिलांच्या पॅनलनेदेखील बँकेचे अधिकार जरी झंवर यांच्याकडे दिले असतील तरी हा उपठेका दिला गेला असे समजले जात नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला एकप्रकारचा दिलासा दिल्याचेच म्हटले जात आहे. मात्र, वॉटरग्रेसच्या कामाबाबत तक्रारी सुरूच असून, आता प्रशासन निर्णय घेऊ शकत नाही. तर सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन महासभेत वॉटरग्रेसबाबत निर्णय घेतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धुळे मनपाने ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला, आता जळगाव मनपा ही महासभेत निर्णय घेण्याची हिंमत दाखवतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकीकडे वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याचे स्पष्ट होत असताना, दुसरीकडे वकिलांच्या पॅनलने वॉटरग्रेस कंपनीला दिलासा दिला आहे. वकिलांच्या अभिप्रायानंतर मनपा प्रशासनानेदेखील वॉटरग्रेसबाबत फाइल बंद करण्याचा निर्णय घेतल्याचेच चित्र आहे. नगरसेवकांकडून वॉटरग्रेसबाबत कमी झालेला विरोध आणि वकिलांच्या अभिप्रायानंतर मनपा प्रशासनाकडूनही वॉटरग्रेसला दिलासा देण्याचीच भूमिका घेतली आहे.

बंद केलेली ‘खुशी’ पुन्हा सुरू

मनपातील ८० पैकी ठरावीक नगरसेवकांकडूनच वॉटरग्रेसच्या कामाबाबत विरोध होताना दिसून येत आहे. मात्र, स्पष्टपणे बोलायला एकही नगरसेवक तयार होत नसून, कचऱ्याऐवजी दगड, माती भरण्याचेच प्रकार उघडकीस आणले जात आहेत. मात्र, महासभेत वॉटरग्रेसबाबत कोणतीही चर्चा होताना दिसून येत नाही. यासह शहरात कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. तरीही स्वच्छतेचा प्रश्न आता नगरसेवकांना दिसून येत नसल्याने शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, वॉटरग्रेसचे प्रकरणाच्या चर्चा बंद झाल्यनंतर अनेक नगरसेवकांनी बंद केलेली ‘खुशी’ पुन्हा सुरू झाल्याची माहिती काही नगरसेवकांनी ‘लोकमत’ला दिली.

वकिलांचे पॅनल सत्ताधाऱ्यांच्याच मर्जीतील : ॲड.विजय पाटील

वॉटरग्रेस कंपनीने सुनील झंवर यांना आपल्या बँक खाते वापरण्याचे सर्व अधिकार दिले आहेत. तरीही प्रशासन यावर कारवाई करण्यास धजावत नाही. वकिलांच्या पॅनलचा अभिप्राय हा केवळ कारवाई टाळण्यासाठीचा खटाटोप आहे. उच्च न्यायालयातील वकिलांचे पॅनल हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील असते, त्यांना मनपाच्या हितापेक्षा सत्ताधाऱ्यांचे हित महत्त्वाचे असते. त्यामुळे वकिलांच्या पॅनलच्या अभिप्रायाला फारसे महत्त्व नसल्याचा आरोप ॲड.विजय पाटील यांनी ‘लोकमत’कडे केला आहे. याबाबत आपला पाठपुरावा सुरू राहणार असल्याचेही ॲड.पाटील यांनी सांगितले.