शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरग्रेसचा विषय आता पदाधिकाऱ्यांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याचा कोणताही पुरावा मनपाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याचा कोणताही पुरावा मनपाकडे नाही. तसेच उच्च न्यायालयातील मनपाच्या वकिलांच्या पॅनलनेदेखील बँकेचे अधिकार जरी झंवर यांच्याकडे दिले असतील तरी हा उपठेका दिला गेला असे समजले जात नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला एकप्रकारचा दिलासा दिल्याचेच म्हटले जात आहे. मात्र, वॉटरग्रेसच्या कामाबाबत तक्रारी सुरूच असून, आता प्रशासन निर्णय घेऊ शकत नाही. तर सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन महासभेत वॉटरग्रेसबाबत निर्णय घेतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धुळे मनपाने ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला, आता जळगाव मनपा ही महासभेत निर्णय घेण्याची हिंमत दाखवतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकीकडे वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याचे स्पष्ट होत असताना, दुसरीकडे वकिलांच्या पॅनलने वॉटरग्रेस कंपनीला दिलासा दिला आहे. वकिलांच्या अभिप्रायानंतर मनपा प्रशासनानेदेखील वॉटरग्रेसबाबत फाइल बंद करण्याचा निर्णय घेतल्याचेच चित्र आहे. नगरसेवकांकडून वॉटरग्रेसबाबत कमी झालेला विरोध आणि वकिलांच्या अभिप्रायानंतर मनपा प्रशासनाकडूनही वॉटरग्रेसला दिलासा देण्याचीच भूमिका घेतली आहे.

बंद केलेली ‘खुशी’ पुन्हा सुरू

मनपातील ८० पैकी ठरावीक नगरसेवकांकडूनच वॉटरग्रेसच्या कामाबाबत विरोध होताना दिसून येत आहे. मात्र, स्पष्टपणे बोलायला एकही नगरसेवक तयार होत नसून, कचऱ्याऐवजी दगड, माती भरण्याचेच प्रकार उघडकीस आणले जात आहेत. मात्र, महासभेत वॉटरग्रेसबाबत कोणतीही चर्चा होताना दिसून येत नाही. यासह शहरात कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. तरीही स्वच्छतेचा प्रश्न आता नगरसेवकांना दिसून येत नसल्याने शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, वॉटरग्रेसचे प्रकरणाच्या चर्चा बंद झाल्यनंतर अनेक नगरसेवकांनी बंद केलेली ‘खुशी’ पुन्हा सुरू झाल्याची माहिती काही नगरसेवकांनी ‘लोकमत’ला दिली.

वकिलांचे पॅनल सत्ताधाऱ्यांच्याच मर्जीतील : ॲड.विजय पाटील

वॉटरग्रेस कंपनीने सुनील झंवर यांना आपल्या बँक खाते वापरण्याचे सर्व अधिकार दिले आहेत. तरीही प्रशासन यावर कारवाई करण्यास धजावत नाही. वकिलांच्या पॅनलचा अभिप्राय हा केवळ कारवाई टाळण्यासाठीचा खटाटोप आहे. उच्च न्यायालयातील वकिलांचे पॅनल हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील असते, त्यांना मनपाच्या हितापेक्षा सत्ताधाऱ्यांचे हित महत्त्वाचे असते. त्यामुळे वकिलांच्या पॅनलच्या अभिप्रायाला फारसे महत्त्व नसल्याचा आरोप ॲड.विजय पाटील यांनी ‘लोकमत’कडे केला आहे. याबाबत आपला पाठपुरावा सुरू राहणार असल्याचेही ॲड.पाटील यांनी सांगितले.