शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

वॉटरग्रेसचा विषय आता पदाधिकाऱ्यांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याचा कोणताही पुरावा मनपाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याचा कोणताही पुरावा मनपाकडे नाही. तसेच उच्च न्यायालयातील मनपाच्या वकिलांच्या पॅनलनेदेखील बँकेचे अधिकार जरी झंवर यांच्याकडे दिले असतील तरी हा उपठेका दिला गेला असे समजले जात नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला एकप्रकारचा दिलासा दिल्याचेच म्हटले जात आहे. मात्र, वॉटरग्रेसच्या कामाबाबत तक्रारी सुरूच असून, आता प्रशासन निर्णय घेऊ शकत नाही. तर सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन महासभेत वॉटरग्रेसबाबत निर्णय घेतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धुळे मनपाने ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला, आता जळगाव मनपा ही महासभेत निर्णय घेण्याची हिंमत दाखवतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकीकडे वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याचे स्पष्ट होत असताना, दुसरीकडे वकिलांच्या पॅनलने वॉटरग्रेस कंपनीला दिलासा दिला आहे. वकिलांच्या अभिप्रायानंतर मनपा प्रशासनानेदेखील वॉटरग्रेसबाबत फाइल बंद करण्याचा निर्णय घेतल्याचेच चित्र आहे. नगरसेवकांकडून वॉटरग्रेसबाबत कमी झालेला विरोध आणि वकिलांच्या अभिप्रायानंतर मनपा प्रशासनाकडूनही वॉटरग्रेसला दिलासा देण्याचीच भूमिका घेतली आहे.

बंद केलेली ‘खुशी’ पुन्हा सुरू

मनपातील ८० पैकी ठरावीक नगरसेवकांकडूनच वॉटरग्रेसच्या कामाबाबत विरोध होताना दिसून येत आहे. मात्र, स्पष्टपणे बोलायला एकही नगरसेवक तयार होत नसून, कचऱ्याऐवजी दगड, माती भरण्याचेच प्रकार उघडकीस आणले जात आहेत. मात्र, महासभेत वॉटरग्रेसबाबत कोणतीही चर्चा होताना दिसून येत नाही. यासह शहरात कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. तरीही स्वच्छतेचा प्रश्न आता नगरसेवकांना दिसून येत नसल्याने शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, वॉटरग्रेसचे प्रकरणाच्या चर्चा बंद झाल्यनंतर अनेक नगरसेवकांनी बंद केलेली ‘खुशी’ पुन्हा सुरू झाल्याची माहिती काही नगरसेवकांनी ‘लोकमत’ला दिली.

वकिलांचे पॅनल सत्ताधाऱ्यांच्याच मर्जीतील : ॲड.विजय पाटील

वॉटरग्रेस कंपनीने सुनील झंवर यांना आपल्या बँक खाते वापरण्याचे सर्व अधिकार दिले आहेत. तरीही प्रशासन यावर कारवाई करण्यास धजावत नाही. वकिलांच्या पॅनलचा अभिप्राय हा केवळ कारवाई टाळण्यासाठीचा खटाटोप आहे. उच्च न्यायालयातील वकिलांचे पॅनल हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील असते, त्यांना मनपाच्या हितापेक्षा सत्ताधाऱ्यांचे हित महत्त्वाचे असते. त्यामुळे वकिलांच्या पॅनलच्या अभिप्रायाला फारसे महत्त्व नसल्याचा आरोप ॲड.विजय पाटील यांनी ‘लोकमत’कडे केला आहे. याबाबत आपला पाठपुरावा सुरू राहणार असल्याचेही ॲड.पाटील यांनी सांगितले.