शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विभाग चौकशीच्या फे:यात

By admin | Updated: January 1, 2016 00:31 IST

भुसावळ : विरोधी सरकारच्या काळात सिंचन विभागाला निधी मिळू शकला नाही.

भुसावळ : विरोधी सरकारच्या काळात सिंचन विभागाला निधी मिळू शकला नाही. हा विभाग घोटाळ्यांमध्ये अडकला आहे. चौकशा सुरू आहेत. चौकशींच्या फे:यात हा विभाग अडकला आहे, अशी भावना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

केळीची अवस्था वाईट आहे. भाव नाही. केळीला शास्वत भाव हवा आहे. केळीसाठी मुख्यमंत्री यांनी महामंडळ घोषीत करावे त्यामुळे केळीवर प्रक्रिया करता येईल, असेही महाजन यावेळी बोलताना म्हणाले. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे बंद असलेला हा महत्त्वांकाशी उद्योग सुरू झाला. आधुनिक सूतगिरणी सुरू झाली. यामुळे क्रांती झाली. रोजगार मिळेल. कापसाला भाव मिळेल, असेही ते म्हणाले. स्व.निखील खडसे यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. सध्या शेतकरी अडचणीत आहे. कापसाला भाव नाही. शेतक:यांना मदतीचा हात दिला पाहिजे. शास्वत शेतीसाठी पाणी व वीज मिळाली पाहिजे.

दहा हजार सौर ऊर्जा पंप

शेतक:यांना दहा हजार सौर वीज पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकरी कष्टाळू आहे. बोदवड उपसा सिंचन योजना, कु:हा-वढोदा सिंचन योजना आहे. अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. ते प्राधान्याने सुरू करायचे आहेत.

वरणगाव उपसा योजना

वरणगाव उपसा योजना दोन महिन्यात सुरू होईल. या सर्व योजनांमुळे एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अनेक प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. मागच्या घोटाळ्यात हे खातं अडकल आहे.घोटाळे, अनियमितता फार झाली आहे. त्यामुळे चौकशीच्या फे:यात हे खात अडकले आहे. महाजन यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करताना जलसंपदा विभागाला एकदाचे 40-50 हजार कोटी रुपये देऊन टाका. सात हजार रुपयांऐवजी 15 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करा. वीज बिल माफी देऊ नका. पाणी आणि वीज द्या,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मेगा रिचार्ज बाबत बोलताना ते म्हणाले, हा प्रकल्प जगातील एक ‘अजुबा’ आहे. हा प्रकल्प सातपुडय़ातून जातो. महाकाय प्रकल्प आहे. मेगा रिचार्ज प्रकल्प चार महिन्यात सुरू व्हायला हवा़