शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

रेल्वे प्रवाशांची माहिती घेण्यासह ढाब्यांची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

जळगाव : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाही करा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न ...

जळगाव : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाही करा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे विभागास दिले आहे. यात बाहेरील जिल्ह्यातून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची माहिती घेण्यासह ढाब्यांची तपासणी करा, बाजार समितीमध्ये गर्दीवर नियंत्रण आणा, अशाही सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दरम्यान, वारंवार सूचना देऊनही या बाबत नागरिक गांभीर्य दाखवित नसल्याने प्रशासनाने कठोर उपाययोजनांच्या दिशेने हालचाली सुरू केल्या असून सोमवारी या विषयी अनेक निर्बंधही घालण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी राऊत यांनी सोमवारी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे महेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त वाय. के बेंडकुळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचे प्रतिनिधी ए.के. पाठक, महानगरपालिकेच्या अपर आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते.

बाजार समितीमध्ये गर्दीवर नियंत्रण आणा

बाजार समितीमध्ये सकाळी घाऊक खरेदीदाराबरोबरच किरकोळ खरेदीदार गर्दी करतात. ती रोखण्यासाठी सहकार विभागाने कडक कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळातच येथे मोठी गर्दी वाढली होती व संसर्ग वाढल्याने यंदा या विषयी दक्षता घेण्यासाठी आतापासून उपाययोजना केल्या जात आहे.

विनामास्क प्रवाशांवर कारवाईचे आदेश

परिवहन विभागाने विनामास्क प्रवाशी आढळल्यास कार्यवाही करावी. एसटी महामंडळाच्या तसेच खासगी बस, रिक्षांमधून जादा प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी मास्क न लावता प्रवास करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी,

बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्या

अमरावती, अकोला, मुंबई, पुणे व नागपूर या जिल्ह्यातून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची माहिती रेल्वे विभागाने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. रेल्वे गाडीतून प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे की एकाच ठिकाणी गर्दी करून प्रवासी प्रवास करीत आहे हे तपासावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ढाब्यांचीही होणार तपासणी

अन्न व औषध विभागाने गर्दी होणाऱ्या उपाहारगृहात तपासणी करावी, गर्दी होणारे ढाब्यांवर तपासणी करावी. ग्राहकांना समोरासमोर न बसविता एक दिशेने बसवून सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

विनामास्क फिरणाऱ्या ३७७ जणांवर कारवाई

महापालिकेने तपासणी केलेल्या कार्यवाहीची माहिती अपर आयुक्त विद्या गायकवाड यांनी बैठकीत दिली. यात ३७७ विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, १४ मंगल कार्यालये, १५ खासगी क्लासेसवर ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. डॉ. रावलाणी यांनी आरोग्यविषयक केलेल्या तयारीची माहिती दिली.