शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

आरक्षणातही गोरबंजारा समाजावर अन्याय -संजय राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

जामनेर : वसंतराव नाईक महामंडळास १ हजार कोटी देण्याची शासनाने केलेली घोषणा पूर्ण होऊ शकली नाही. इतर समाजास, महामंडळांना ...

जामनेर : वसंतराव नाईक महामंडळास १ हजार कोटी देण्याची शासनाने केलेली घोषणा पूर्ण होऊ शकली नाही. इतर समाजास, महामंडळांना शासन निधी देते. मात्र, गोरबंजारा समाजावरच अन्याय का? आरक्षणाबाबतीतही समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप माजी वनमंत्री आ. संजय राठोड यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला.

तालुक्यातील गोरबंजारा समाजाच्या तांड्यावर भेटीसाठी आलेल्या राठोड यांनी आरक्षण बाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्हाला कुणाच्याही ताटातले नको, आमचे हक्काचे तेवढे द्या. व्हीजेएनटीमधील मूळ इम्पिरिकल डेटानुसार आरक्षण मिळाले पाहिजे. आजपर्यंत १० आयोगांची स्थापना झाली. मात्र, पदरात काहीच पडले नाही. समाजाची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. अति मागासलेले असा उल्लेख इंग्रजांनी केला होता. एसटी संवर्गाच्या साडेसात टक्के आरक्षणाला धक्का लागू न देता गोरबंजारा समाजाला एसटी ब संवर्गात समावेश करून आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.

शासनाने समाजाचे पदोन्नतीचे आरक्षण थांबविले, व्हीजेएनटीतील परिवर्तनीय बिंदू आम्हाला नको. आजही समाज बांधव सामाजिक व आर्थिक मागासले असून, उच्च शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहिले आहे. नाईक महामंडळास निधी मिळत नसल्याने उद्योग व्यवसायापासून समाजातील युवक वंचित राहिले आहे. राज्य शासनाने आरक्षणाबाबत शिफारस करून केंद्राकडे पाठविली पाहिजे ही आमची मागणी यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानादेखील केली होती व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील केली आहे.