शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या अर्थसंकल्पात कोट्यवधी निधीच्या फुगवटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST

महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी सादर केला. यावर्षी ११९३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर ...

महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी सादर केला. यावर्षी ११९३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये शहरातील मूलभूत सुविधांसह उद्यानांचा व इतर विकासात्मक घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी महापालिकेकडून हा अर्थसंकल्प सादर केला जातो. यामध्ये अनेक कोट्यवधींच्या घोषणांची खैरात वाटली जात असते. मात्र हा अर्थसंकल्प केवळ घोषणांचा चा अर्थ संकल्प आता राहून जात आहे. कारण अर्थसंकल्पात होणार्‍या तरतुदी या केवळ त्या दिवसा पुरताच हेडलाईन बनून राहतात. त्यानंतर अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी कडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. गेल्यावेळचा अर्थसंकल्प देखील तत्कालीन सभापती ॲड.शुचिता हाडा यांनी सादर केला होता. त्यात शहरातील प्रभाग समिती कार्यालय मजबूत करण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतर देखिल ही घोषणा केवळ घोषणाच राहिली. याकडे मनपा प्रशासन किंवा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी देखील कोणतेही लक्ष दिले नाही. या वर्षी देखील शहरातील उद्यानांचा विकास, रस्त्यांसाठी १२५ कोटींची घोषणा तसेच शहरातील इतर विकास कामांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्प द्वारे करण्यात आलेला घोषणा व त्यासाठी लागणारा निधी हा मनपा फंडातून निर्माण केला जातो. मनपाची आर्थिक स्थिती लक्षात घेता महापालिकेकडून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी कोणत्याही कामाला दिलाच जाऊ शकत नाही असे असतानाही कोट्यवधीची घोषणा ही केवळ जनतेची दिशाभूल ठरू शकते. महापालिकेच्या हक्काचा उत्पन्नकडे कोणतेही लक्ष देण्यात येत नाही. खुला भूखंड कर असो, वा शहरातील मेहरूण भागात पडलेल्या घरकुलचे खंड र असो, तसेच महापालिकेच्या मोकळ्या मात्र कोट्यवधींच्या जागांकडे प्रशासन किंवा पदाधिकारी देखील लक्ष द्यायला तयार नाही. या जागांबाबत महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तसेच कोणत्याही कामासाठी महापालिका प्रशासनाला राज्य शासनाच्या निधीवर अवलंबून राहण्याची देखील गरज पडणार नाही. मात्र दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या हक्काच्या मालमत्ता कडे दुर्लक्ष केले जाते. अर्थसंकल्पात मोठ-मोठ्या कोट्यवधीच्या घोषणा न करता महापालिकेच्या हक्काचा उत्पन्नकडे जरी लक्ष दिले तरी महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारून शहराच्या विकासाचा मार्ग सापडू शकतो.