शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

मनपाच्या अर्थसंकल्पात कोट्यवधी निधीच्या फुगवटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST

महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी सादर केला. यावर्षी ११९३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर ...

महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी सादर केला. यावर्षी ११९३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये शहरातील मूलभूत सुविधांसह उद्यानांचा व इतर विकासात्मक घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी महापालिकेकडून हा अर्थसंकल्प सादर केला जातो. यामध्ये अनेक कोट्यवधींच्या घोषणांची खैरात वाटली जात असते. मात्र हा अर्थसंकल्प केवळ घोषणांचा चा अर्थ संकल्प आता राहून जात आहे. कारण अर्थसंकल्पात होणार्‍या तरतुदी या केवळ त्या दिवसा पुरताच हेडलाईन बनून राहतात. त्यानंतर अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी कडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. गेल्यावेळचा अर्थसंकल्प देखील तत्कालीन सभापती ॲड.शुचिता हाडा यांनी सादर केला होता. त्यात शहरातील प्रभाग समिती कार्यालय मजबूत करण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतर देखिल ही घोषणा केवळ घोषणाच राहिली. याकडे मनपा प्रशासन किंवा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी देखील कोणतेही लक्ष दिले नाही. या वर्षी देखील शहरातील उद्यानांचा विकास, रस्त्यांसाठी १२५ कोटींची घोषणा तसेच शहरातील इतर विकास कामांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्प द्वारे करण्यात आलेला घोषणा व त्यासाठी लागणारा निधी हा मनपा फंडातून निर्माण केला जातो. मनपाची आर्थिक स्थिती लक्षात घेता महापालिकेकडून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी कोणत्याही कामाला दिलाच जाऊ शकत नाही असे असतानाही कोट्यवधीची घोषणा ही केवळ जनतेची दिशाभूल ठरू शकते. महापालिकेच्या हक्काचा उत्पन्नकडे कोणतेही लक्ष देण्यात येत नाही. खुला भूखंड कर असो, वा शहरातील मेहरूण भागात पडलेल्या घरकुलचे खंड र असो, तसेच महापालिकेच्या मोकळ्या मात्र कोट्यवधींच्या जागांकडे प्रशासन किंवा पदाधिकारी देखील लक्ष द्यायला तयार नाही. या जागांबाबत महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तसेच कोणत्याही कामासाठी महापालिका प्रशासनाला राज्य शासनाच्या निधीवर अवलंबून राहण्याची देखील गरज पडणार नाही. मात्र दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या हक्काच्या मालमत्ता कडे दुर्लक्ष केले जाते. अर्थसंकल्पात मोठ-मोठ्या कोट्यवधीच्या घोषणा न करता महापालिकेच्या हक्काचा उत्पन्नकडे जरी लक्ष दिले तरी महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारून शहराच्या विकासाचा मार्ग सापडू शकतो.