शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

जात पंचायतीच्या विळख्यात फासेपारध्यांची घुसमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST

रवींद्र हिरोळे मुक्ताईनगर जि. जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील तीन गावांमधील आदिवासी जात पंचायतीच्या विळख्यात सापडले आहेत. फासेपारधी समाजातील ...

रवींद्र हिरोळे

मुक्ताईनगर जि. जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील तीन गावांमधील आदिवासी जात पंचायतीच्या विळख्यात सापडले आहेत. फासेपारधी समाजातील काही अपप्रवृत्तीची माणसे जात पंचायतीच्या नावाखाली मुखिया बनून फासेपारध्यांचे शोषण करत आहेत. या प्रकाराला कंटाळलेल्या या लोकांनी थेट राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करीत जाचातून सुटका करण्याची हाक दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लालगोटा, हलखेडा आणि मदापुरी ही फासेपारधी बहुल आदिवासी गावे. परंपरागत रुढी आणि मान्यतांना वर्षानुवर्षे जपत फासेपारध्यांनी आपले वेगळेपण जपले आहे. मात्र यातील काही अनिष्ट रुढी फासेपारध्यांचे आर्थिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक शोषण करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार समाजातील लोकांमध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण करायचा. त्यांची जात पंचायत बसवायची आणि त्यांच्याकडूनच लाखो रुपये दंड वसूल करायचा. दंड भरला नाही तर त्यांना गावातून हाकलून लावायचे आणि त्यांच्या जमिनीवर कब्जा करायचा.

दादागिरीने त्यांच्या मुलींची परप्रांतीय लोकांना विक्री करायची, या मोबदल्यात लाखो रुपये कमावायचे, महिला- मुलींना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी करायची, असे प्रकार हे तथाकथित मुखिया मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. अशा आशयाची तक्रार ग्रामस्थांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे केली आहे.

चौकट

यांच्या विरोधात तक्रार

सिगरेटबाबू ऊर्फ ठगडी कोनानी पवार, युवराज जिल्लाल भोसले, शिलोन कालूसिंग भोसले, दर्शनलाल राजमल पवार, शम्मी जिल्लाल भोसले, टोनी

दर्शनलाल पवार या मुखियांविरुद्ध ग्रामस्थांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.

चौकट

यांचा सुरू आहे लढा

या तथाकथित जात पंचायती विरोधात लालगोटा, हलखेडा, मदापुरी येथील अक्काबाई जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले, बल्लू गलोबा भोसले, भगवान भोसले, विशाल पवार, केनसिंग भोसले, सोद्यासिंग पवार, मोंटूस पवार, शरबतलाल पवार, उर्मिला पवार, टिंकू भोसले, राजमिना पवार, नीलम पवार, कृष्णा पवार, कालीबाई पवार, चट्टाणसिंग पवार, रमेश पवार, हबाब पवार, केवळदास पवार, जीनाबाई भोसले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी लढा सुरू केला आहे. सन २०१३ पासून पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे जातपंचायत विरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. आताही शेकडो लोकांनी राज्य मानवी हक्क आयोग कडे स्वाक्षऱ्या आणि अंगठे देऊन तक्रार दिली असून या जाचक परंपरेतून सुटका करण्याची याचना केली आहे.