शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

ग्रामपंचायत निवडणुकीत वाढला मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पार पडल्या. गावकीची पंचाईत दूर झाली असली तरी कुणी कुठे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पार पडल्या. गावकीची पंचाईत दूर झाली असली तरी कुणी कुठे मतदान केले याचे हिशोब बेरकी राजकारणी मारत बसले असतील. मात्र, यंदा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ७८.११ टक्के मतदान झाले आहे.

गावातील निवडणुका म्हटल्या की, भावकीचे राजकारण सुरू होते. एकाच भावकीतील दोन जण उभे असतील. तर वाद नको म्हणूनदेखील अनेकजण मतदानाला जात नाही. मात्र, यंदा असे फारसे झालेले दिसून येत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ७८ टक्केपेक्षा जास्त मतदान झाले आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीपेक्षा देखील हे मतदान जास्त आहे. २०१४ मध्ये त्यावेळच्या सरकारविरोधात जोरदार लाट होती. त्यामुळे लोकांनी पुढे येत मतदान केले होते. त्यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघात ६३.३४ टक्के मतदारांनी पुढे येत मतदान केले होते. तर जळगाव लोकसभा मतदारसंघात ही आकडेवारी कमी होती. मात्र, यंदाचे बदललेले राजकीय चित्र त्यातून सध्याच्या राज्य सरकारविरोधातील नाराजी पाहता अनेक जण मतदानाला पुढे आल्याचे दिसत आहे.

लोकसभेसाठी मतदान

जळगाव जिल्ह्यात लोकसभेचे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात दोन्हीवेळा जळगाव मतदारसंघापेक्षा रावेरला जास्त मतदान होत असते. २०१९ मध्ये देखील रावेरला ६१ टक्के मतदान झाले होते. तर जळगावला ५६ टक्केच मतदान झाले होते.

विधानसभेला मतदान

जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात २०१९ ला ५८.६० टक्के मतदान झाले होते. जळगाव शहर मतदारसंघांमध्ये मतदानाला नागरिकांचा फारसा उत्साह नव्हता. त्यावेळी काही ठिकाणी अगदीच एकेरी लढती झाल्या होत्या. त्यामुळे देखील विधानसभेत मतदानाला नागरिकांचा फारसा उत्साह नव्हता.

ग्रामपंचायत मतदान

जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यात शिरसोली प्र.न. आणि शिरसोली प्र.बो., म्हसावद, भादली, आसोदा या मोठ्या ग्रामपंचायतींमध्येदेखील मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तसेच ममुराबाद, आव्हाणे येथेही मोठ्या प्रमाणात मतदान झाले.

आकडेवारी

लोकसभा निवडणूक

२०१४

रावेर मतदारसंघ - ६३.३४ टक्के

जळगाव मतदारसंघ - ५७.९८ टक्के

विधानसभा निवडणूक २०१९

५८.६० टक्के

ग्रामपंचायत निवडणूक २०२१

७८.११ टक्के