शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शाळांसोबत विद्याथ्र्याच्या गुणवत्ता वाढीवर भर - जि.प. सीईओ कौस्तुभ दिवेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 12:25 IST

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये करण्यात येत असलेले प्रय}, शालेय पोषण आहाराचा मुद्दा, शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात येणा:या विविध उपक्रमांबाबत चर्चा केली

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 19 - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्याथ्र्याना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षकांकडून डिजिटल अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून तो लवकरच शाळांमध्ये शिकविला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिवेगावकर यांनी पहिल्यांदाच ‘लोकमत’शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये करण्यात येत असलेले प्रय}, शालेय पोषण आहाराचा मुद्दा, शिक्षक बदली प्रक्रिया व भविष्यात जि.प.च्या माध्यमातून राबविण्यात येणा:या विविध उपक्रमांबाबत मनमोकळेपणाने चर्चा केली. त्यांच्याशी साधलेला संवाद असा..जि.प. शाळेच्या शिक्षकांनीच तयार केला अभ्यासक्रमदिवेगावकर म्हणाले की, डिजिटल शाळा ंआणि विद्याथ्र्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांच्या मदतीने अभ्यासक्रम तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी कोणताही आर्थिक खर्च करण्यात आला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यासाठी विविध विषयात तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांच्या समित्या तयार करण्यात आल्या. त्यांनीच अभ्यास करुन अभ्यासक्रम तयार केला आहे. तो अभ्यासक्रम विद्याथ्र्याना शिकविण्यात येणार आहे. डिजिटल शाळांमध्ये केवळ वार्षिक अभ्यासक्रम पूर्ण करायचा या भावनेने शिकविणा:या शिक्षकांची गरज नाही. विद्याथ्र्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रय} व्हावेत. शिक्षणाद्वारे उद्याचा चांगला नागरिक घडला पाहिजे. अधिकारांचे विकेंद्रीकरण स्थानिक पातळीवर नागरिकांना अनेक समस्या असतात. मात्र अनेकदा नागरिक लहान-लहान समस्या घेऊन थेट जिल्ह्याच्या ठिकाणी येतात. त्यात त्यांचे वेळ व पैसा खर्च होत असतो. स्थानिक पातळीवरच त्यांच्या समस्या मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकारांचे विक्रेंदीकरण करण्यात आले आहे. शिक्षकांनी मानसिकता बदलावीदिवेगावकर म्हणाले, यंदा शिक्षक बदली प्रक्रियेत शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार अवघड व सर्वसाधारण क्षेत्र असे दोन भाग तयार केले. मात्र अनेक शिक्षकांकडून अवघड क्षेत्रात जायला नकार दिला जातो. मात्र राज्यात गडचिरोली, नंदुरबार अशा दुर्गम भागातदेखील शिक्षक चांगले काम करत आहेत. जर या अवघड क्षेत्रात शिक्षक जाणार नाहीत. तर त्या ठिकाणी कोण काम करणार? शिक्षकांनी आपल्या मानसिक तेत बदल करण्याची गरज आहे. साने गुरुजी हे मूळ कोकणातील. असे असतानाही ते जळगाव जिल्ह्यात आले. अमळनेर येथे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे.