शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यातील उद्योग वाढीसाठी अधिकाधिक वित्तपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यातील उद्योग वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना जास्तीत जास्त वित्तपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यातील उद्योग वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना जास्तीत जास्त वित्तपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या उद्योगांसाठी अधिकाधिक वित्तपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यावतीने राज्यातील बँकांना दिले. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी मदत व्हावी म्हणून डिसेंबर अखेरच्या तिमाहित सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी एक लाख ९६ हजार ५७४ कोटी रुपयांचा अर्थपुरवठा केला गेला आहे. राज्यभरातील उद्योगांसाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.

राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी होणाऱ्या वित्तपुरवठा व या उद्योगांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात गुुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उच्चाधिकार समितीची ऑनलाईन बैठक झाली. यामध्ये या उद्योगांच्या स्थितीचा आढावा घेऊन अधिकाधिक वित्तपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक संगीता ललवाणी, वरिष्ठ संचालक अजय मिचिरिया, उच्चाधिकार समितीचे महाराष्ट्र-गोवा सदस्य संजय दादलिका (जळगाव), राज्याच्या उद्योग संचालक कार्यालय अधिकारी यांच्यासह राज्यातील विविध बँकांचे तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे प्रमुख सहभागी झाले होते.

कोरोनाच्या सावटाखाली उद्योगांची स्थिती पाहता उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या वित्त पुरवठ्याची गरज असून या उद्योगांना अधिकाधिक वित्तपुरवठा व्हावा व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव राज्याचे उच्चाधिकार समितीचे सदस्य संजय दादलिका यांनी मांडला. त्याला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आरबीआय प्रतिनिधींनी अधिकाधिक वित्त पुरवठ्याविषयी सूचना दिल्या. यामध्ये या उद्योगांसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करुन देण्याविषयी राज्याकडे शिफारस केल्याची माहिती दादलिका यांनी दिली. यामुळे आता या उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या असून गेल्या वर्षी लॉकडाऊन काळातील बसलेल्या झळांमधून सावरण्यासही मदत होणार असल्याचा विश्वास उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

राज्यातील अनेक बँकांमध्ये मोठ्या खात्यांची थकबाकी वाढल्याने ती नियमित करण्यासाठी आरबीआयने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या वेळी दादलिका यांनी केली. यात ही खाते नियमित झाल्यास ते मंदीतून सावरू शकतील, असेही त्यांनी सूचविले.