शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य साठा मर्यादेत केंद्र सरकारने केली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST

प्रभाव लोकमतचा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कडधान्य साठा मर्यादेवर आणलेल्या बंधनांमध्ये काहीसा बदल करीत केंद्र सरकारने साठा मर्यादेत ...

प्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कडधान्य साठा मर्यादेवर आणलेल्या बंधनांमध्ये काहीसा बदल करीत केंद्र सरकारने साठा मर्यादेत वाढ केली आहे. या निर्णयानुसार आता घाऊक व्यापारी ५०० मेट्रिक टन कडधान्य साठा करू शकतील व दालमिल उद्योग वार्षिक उलाढालीच्या ५० टक्के साठा करू शकतील. या संदर्भात व्यापाऱ्यांना पाठपुरावा करण्यासह ‘लोकमत’नेही वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १९ रोजी केंद्र सरकारने साठा मर्यादा वाढवून दिली आहे.

२ जुलै रोजी केंद्र सरकारने अचानक कडधान्यांसाठी साठा मर्यादा लागू केली होती. यामुळे घाऊक व्यापाऱ्यांना केवळ २०० मेट्रिक टनपर्यंत साठा करण्याची परवानगी होती व त्यातही एखाद्या कडधान्याचे १०० मेट्रिक टन पेक्षा जास्त साठा असू नये, अशी अट होती. याशिवाय दालमिल उद्योगांना वार्षिक उलाढालीच्या २५ टक्के पर्यंत साठा करण्याची मुभा होती. या अटी व कायद्यामुळे कडधान्य व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता व शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. इतकेच नव्हे कडधान्यांचे अगोदरच हमीभावापेक्षा कमी असलेले दर अजून २०० ते १००० प्रति क्विंटलने कमी झाले. या नवीन कायद्याच्या विरोधात देशातील अनेक बाजार समितीत व्यापाऱ्यांनी संप पुकारला होता. व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन १६ जुलै रोजी भारत बंदचे आवाहन केले होते.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांविषयी लोकमतने पाठपुरावा करीत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच कॅट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन शेतकरी व व्यापाऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान व अडचणी लक्षात आणून दिल्या. त्या नंतर १९ जुलै रोजी केंद्र सरकारने नवीन आदेश काढून साठा मर्यादेत वाढ केली.

या नवीन आदेशानुसार आता घाऊक व्यापारी ५०० मेट्रिक टन कडधान्य साठा करू शकतील व दालमिल उद्योग वार्षिक उलाढालीच्या ५० टक्के साठा करू शकतील. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असल्याची माहिती कॅटचे जिल्हाध्यक्ष संजय शहा, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, राज्य सचिव प्रवीण पगारिया यांनी दिली.