शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कडधान्य साठा मर्यादेत केंद्र सरकारने केली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST

प्रभाव लोकमतचा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कडधान्य साठा मर्यादेवर आणलेल्या बंधनांमध्ये काहीसा बदल करीत केंद्र सरकारने साठा मर्यादेत ...

प्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कडधान्य साठा मर्यादेवर आणलेल्या बंधनांमध्ये काहीसा बदल करीत केंद्र सरकारने साठा मर्यादेत वाढ केली आहे. या निर्णयानुसार आता घाऊक व्यापारी ५०० मेट्रिक टन कडधान्य साठा करू शकतील व दालमिल उद्योग वार्षिक उलाढालीच्या ५० टक्के साठा करू शकतील. या संदर्भात व्यापाऱ्यांना पाठपुरावा करण्यासह ‘लोकमत’नेही वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १९ रोजी केंद्र सरकारने साठा मर्यादा वाढवून दिली आहे.

२ जुलै रोजी केंद्र सरकारने अचानक कडधान्यांसाठी साठा मर्यादा लागू केली होती. यामुळे घाऊक व्यापाऱ्यांना केवळ २०० मेट्रिक टनपर्यंत साठा करण्याची परवानगी होती व त्यातही एखाद्या कडधान्याचे १०० मेट्रिक टन पेक्षा जास्त साठा असू नये, अशी अट होती. याशिवाय दालमिल उद्योगांना वार्षिक उलाढालीच्या २५ टक्के पर्यंत साठा करण्याची मुभा होती. या अटी व कायद्यामुळे कडधान्य व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता व शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. इतकेच नव्हे कडधान्यांचे अगोदरच हमीभावापेक्षा कमी असलेले दर अजून २०० ते १००० प्रति क्विंटलने कमी झाले. या नवीन कायद्याच्या विरोधात देशातील अनेक बाजार समितीत व्यापाऱ्यांनी संप पुकारला होता. व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन १६ जुलै रोजी भारत बंदचे आवाहन केले होते.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांविषयी लोकमतने पाठपुरावा करीत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच कॅट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन शेतकरी व व्यापाऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान व अडचणी लक्षात आणून दिल्या. त्या नंतर १९ जुलै रोजी केंद्र सरकारने नवीन आदेश काढून साठा मर्यादेत वाढ केली.

या नवीन आदेशानुसार आता घाऊक व्यापारी ५०० मेट्रिक टन कडधान्य साठा करू शकतील व दालमिल उद्योग वार्षिक उलाढालीच्या ५० टक्के साठा करू शकतील. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असल्याची माहिती कॅटचे जिल्हाध्यक्ष संजय शहा, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, राज्य सचिव प्रवीण पगारिया यांनी दिली.