शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक आरोग्य सेवेचे महत्त्व अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 00:01 IST

गैरसोयी, दुर्लक्ष तरीही गरीब, गरजूंसाठी सरकारी दवाखाने उपयुक्त, महाआरोग्य शिबिरे घेऊन काय साधले हा लाखमोलाचा प्रश्न, आरोग्य सेवेच्या इमारती उभ्या राहिल्या; सुविधांकडे मात्र पाठ

मिलिंद कुलकर्णी

कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेचे महत्त्व अबाधित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शहरांमधील बहुसंख्य मोठमोठी खाजगी रुग्णालये कोरोनाच्या आपत्ती काळात कुलूपबंद झालेली असताना सार्वजनिक आरोग्य सेवा सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना आधार वाटत आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या काही अडचणी, प्रश्न असतील, परंतु, संकटसमयी ही मंडळी मागे हटली, हे सामान्य जनांना जाणवल्याशिवाय राहिले नाही.सार्वजनिक सेवांचे महत्त्व अशा प्रसंगी पटते. मग ती आरोग्य सेवा असो की, एस.टी., रेल्वे, टेलिफोन सेवा असो...या सामान्यांच्या हक्काच्या सेवा आहेत. त्यामुळे जनक्षोभाच्या पहिल्या बळी याच सार्वजनिक सेवा ठरतात, हे देखील तेवढेच वास्तव आहे. या सेवांमध्ये खाजगीकरण आल्यानंतर लोक ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ या पध्दतीप्रमाणे तिकडे वळले तरी सार्वजनिक सेवांचे महत्त्व कमी झालेले नाही.शहरी व ग्रामीण भागात असुविधा, दुर्लक्ष यांचा सामना करीत सार्वजनिक आरोग्य सेवा आजही कार्यरत आहेत. कोरोनाविरुध्दच्या लढाईत योगदान देत आहे.याउलट महाआरोग्य शिबिरे, आरोग्यदूत यांचा मध्यंतरीच्या काळात मोठा सुळसुळाट झाला होता. मुंबई-पुण्याचे डॉक्टर तालुकापातळीवर येऊन एक-दोन दिवसांत हजारो रुग्णांची तपासणी करुन गेले. नंतर त्यांची मुंबई, पुण्याला शिफारस केली गेली. पुढे काय झाले, हे कधीच कुणाला कळले नाही. इव्हेंट मोठा झाला. मुख्यमंत्री, मंत्री आले. कौतुक करुन गेले. फाऊंडेशन, प्रतिष्ठानांच्या स्वमालकीच्या इमारती झाल्या. आरोग्यदूत चारचाकी वाहनांमधून फिरु लागले. काहींना पुरस्कृत केले गेले. ही भौतिक प्रगती होत असताना सार्वजनिक आरोग्य सेवेकडे मात्र पुरते दुर्लक्ष झाले. अत्याधुनिक यंत्रसामुग्री येऊनही ती वर्षभर पडून राहू लागली. व्हेंटीलेटर अपूर्ण आहेत. महिन्याभरानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा उपाय असलेले किट मिळतात. कोरोना कक्ष गलिच्छ जागेत सुरु होतो. हे कसले लक्षण आहे? वर्षभर या रुग्णालयांमध्ये वावरणारे सामाजिक कार्यकर्ते, आरोग्यदूत मोक्याच्या प्रसंगी मात्र गायब आहेत.खासदार आणि आमदार निधीचा विनियोग हा देखील खरे तर संशोधनाचा विषय आहे. व्यायामशाळा, हायमस्ट लॅम्प, समाजमंदिर, स्पर्धा परीक्षांची पुस्तके या गोष्टींवर सर्वाधिक निधी खर्च होत असताना सार्वजनिक आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी किती निधीची तरतूद केली गेली, हेही एकदा तपासून पहायला हवे. आता केंद्र सरकारने खासदार निधीतून एक कोटी रुपये वर्ग करुन घेतले, ते एक बरे झाले. किमान कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य सेवेकडे लक्ष तरी दिले जाईल. त्यांचे बळकटीकरण तरी होईल.खान्देशात गेल्या पाच वर्षांत महाआरोग्य शिबिरांचे भव्य आयोजन केले गेले. लाखो लोकांनी त्याचा लाभ घेतल्याचा दावा केला गेला. मात्र सार्वजनिक आरोग्य सेवेचे वास्तव चित्र ‘कोरोना’मुळे समोर आले. इव्हेंटचा बुडबुडा फुटला.वैद्यकीय महाविद्यालय, सामान्यरुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पालिका रुग्णालये ही गोरगरीब जनतेच्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. परंतु, या रुग्णालयांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. व्हेंटीलेटर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपाय या गोष्टींचा अभाव जाणवत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव