शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

उडीद व मुगाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:21 IST

जळगाव : यंदाच्या खरीप हंगामात जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने व पावसाचा मोठा खंड पडल्याने ७० टक्के उडीद, मुगाच्या ...

जळगाव : यंदाच्या खरीप हंगामात जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने व पावसाचा मोठा खंड पडल्याने ७० टक्के उडीद, मुगाच्या पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाताशी पिक येण्याची शक्यता धूसर होत आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावे, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या विषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १७ ऑगस्टनंतर झालेल्या सततच्या पावसाने, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकालादेखील कोंब फुटलेले आहेत. यामुळे उडीद व मुगाचे थोडेफार येणारे उत्पादन देखील पूर्णपणे वाया गेलेले आहे. जिल्ह्यात उडीदाची २० हजार ९११ हेक्टर व मुगाची २२ हजार ९२४ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. हे पिकं पूर्णपणे वाया गेलेले असून शेतकऱ्यांना यापासून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न मिळणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तातडीने महसूल व कृषी विभागाचे यंत्रणेमार्फत प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ई-पीक पाहणी ॲपमधील पिक पेऱ्याची सक्ती नको

बहुतांश शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲप बाबत परिपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या ॲपबाबत शेतकऱ्यांना सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.