शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

वॉटरग्रेस प्रकरणी तोंड उघडले तर अधिकारीच येणार गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहराच्या दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस प्रकरणी महत्वाची माहिती हाती लागली असून, वेळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहराच्या दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस प्रकरणी महत्वाची माहिती हाती लागली असून, वेळ आल्यावर याबाबतचा खुलासा महासभेतच केला जाईल. आता जर तोंड उघडले तर मनपातील अधिकारीच गोत्यात येतील असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केला. मंगळवारी मनपा स्थायी समितीची सभा सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त प्रशांत पाटील, संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. स्थायी समितीच्या मंजुरीसाठी तीन विषय ठेवण्यात आले होते. तिन्ही विषयांना स्थायीने मंजुरी दिली. आयत्यावेळच्या विषयावर ही सभा गाजली. त्यात भुयारी गटार योजनेमुळे खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यासह वॉटरग्रेस व स्वच्छतेच्या मुद्द्यावरही नगरसेवकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.

मक्तेदारावर जबाबदारी झटकून पळ काढू नका

शहरातील अनेक भागात कचऱ्याच्या समस्या निर्माण झाल्या असून, कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या असल्याची माहिती नगरसेविका प्रतिभा कापसे यांनी दिली. त्यावर आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी मक्तेदाराला नियोजन करायचे असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी संताप व्यक्त करत, प्रत्येकवेळी मक्तेदारावर जबाबदारी झटकून समस्येपासून पळ काढू नका, मक्तेदारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपाची असून, त्याकडे लक्ष देण्याचा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच वॉटरग्रेसबाबत मनपा गंभीर नसल्याचे सांगत, वेळ आल्यावर सर्व माहिती जाहीर करु असा इशारा नितीन बरडे यांनी यावेळी दिला.

मातीने बुजविले जाताहेत खड्डे

१. मनपासमोर खोदकाम झाल्यानंतर मनपाने २४ तासाच्या आत रस्त्याची दुरुस्ती करुन घेतली. ही तत्परता शहरातील इतर भागात का दाखविली जात नाही ? असा प्रश्न नगरसेवक प्रशांत नाईक यांनी उपस्थित केला.

२. महाबळ भागात मनपाकडून माती टाकून खड्डे दुरुस्त केले जात असल्याची तक्रार नितीन बरडे यांनी केली. नगरसेविकेचा अपघात या खड्ड्यांमुळे झाला असून, मनपाने गांभीर्याने घ्यावे असाही इशारा बरडे यांनी दिला.

‘त्या’भूसंपादनाच्या विषयावर उच्च न्यायालयात मनपाकडून याचिका दाखल

शिवाजीनगर हुडको भागातील भूसंपादनाच्या विषयावर न्यायालयाने मनपा प्रशासनाला जागेचा मोबदला म्हणून जागा मालकाला १५ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. त्यातील ७ कोटींची रक्कम मनपाने भरली आहे. उर्वरित रकमेबाबत काही दिलासा मिळावा तसेच ही रक्कम जास्त असल्याने मनपाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून, मनपाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती मनपा आयुक्तांनी सभेत दिली. तसेच यासाठी ॲड. शैलेश ब्रम्हे यांना नियुक्त करण्यात आले असून, त्यांना ही केस लढविण्यासाठी ३ लाख रुपयांचे शुल्क देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला.