शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कचऱ्याच्या धुराची समस्या कायम राहिली तर घरं विक्री काढण्याशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

पवार पार्क,चंदू अण्णा नगर परिसरातील नागरिकांच्या व्यथा : बंद घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

पवार पार्क,चंदू अण्णा नगर परिसरातील नागरिकांच्या व्यथा : बंद घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील आव्हाणे शिवारात गेल्या ८ वर्षांपासून बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पातून निघणाऱ्या कचऱ्याचा धुरामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील चंदू अण्णा नगर, पवार पार्क, निमखेडी परिसर, खोटे नगर परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, हीच समस्या अशाच प्रकारे कायम राहणार असली तर या भागातून घरं विक्री करून पलायन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

मनपा प्रशासनाला अजूनही बंद घनकचरा प्रकल्प सुरु करता आलेला नाही. याठिकाणी पडलेल्या सुमारे १ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर अजूनही प्रक्रिया झालेली नसल्याने, रासायनिक प्रक्रियेमुळे या कचऱ्याला आग लागत आहे. तसेच अनेकवेळा मनपा कर्मचारी या कचऱ्याला आग लावतात. अनेक वर्षांपासून हा कचरा जळत असून, जळणाऱ्या कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.

२४ तास घराचा दरवाजा ठेवावा लागतो बंद

दिवस असो वा रात्र २४ तास या भागात धूर पसरत असतो, त्यामुळे घराचा दरवाजा बंद ठेवावा लागत असल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. त्यात पाऊस झाला तर रस्ते नसल्याने या भागात चिखल पसरतो, तर पाऊस नसला तर सकाळी वाहने वापरत असल्याने रस्त्यावरची सर्व धूळ घरांमध्ये जाते. तर रात्रीच्या वेळेस घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे निघणारा धूर घरांमध्ये जातो. यामुळे घरात थांबणेही कठीण झाले आहे. मनपाकडून रस्त्याचीही दुरुस्ती केली जात नाही. दुसरीकडे धुराबाबत देखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. स्थानिक नगरसेवक व मनपा प्रशासनाकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याचेही रहिवाशांनी सांगितले.

घर विक्री करून गावाकडे परतावे लागेल

काही वर्षांपूर्वी शहरापासून दूर व शांतता असलेला परिसर असल्याने या भागात घर घेतले. मात्र, घर घेतल्यापासून असा एक दिवस नाही गेला की त्या दिवशी धुरापासून आम्हाला त्रास झाला नाही. कोणताही सण असो वा कार्यक्रम अशा परिस्थितीत देखील आम्हाला घर बंद ठेवावे लागते अशी माहिती सुरेखा पाटील या गृहिणीने दिली. या भागात घर घेतल्यानंतर ही समस्या दररोज सहन करावी लागत आहे. आता ही समस्या जर कायम राहिली तर या भागातील सर्वांना ही घरं विक्री करून इतरत्र किंवा पुन्हा गावांमध्ये स्थायिक व्हावे लागेल असा संताप जुई पाटील यांनी व्यक्त केला.

तक्रारी, निवेदन देऊन, आंदोलन करुन थकलो

या भागातील समस्यांबाबत स्थानिक नगरसेवकांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मनपा प्रशासन, महापौर, उपमहापौर, आमदार यांच्यासह पर्यावरणवादी संघटनांना निवेदन देण्यात आले. कोणीच ऐकून घेत नाही. म्हणून कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरून आंदोलन देखील केले. मात्र, कोणत्याही प्रकारचे लक्ष मनपा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी देखील द्यायला तयार नाहीत. सर्वांनी या भागातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले असून, कोणालाही आमच्या समस्यांशी घेणे-देणे नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

कोट..

गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याचा धुरामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. धुरामुळे घराबाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. अनेकदा घरातच धुरामुळे श्वास घ्यायला देखील त्रास होत असतो.

- योगेश पाटील, रहिवासी, पवार पार्क

नागरिक आता कोरोना आला म्हणून मास्क लावत आहेत. मात्र, आमच्या पवार पार्क मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मास्क घालत आहे. कारण, मास्क नाही घातला तर विषारी धुरामुळे आमचे जगणे कठीण होऊन जाईल.

-भूषण जाधव, रहिवासी, चंदू अण्णा नगर परिसर