शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कचऱ्याच्या धुराची समस्या कायम राहिली तर घरं विक्री काढण्याशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

पवार पार्क,चंदू अण्णा नगर परिसरातील नागरिकांच्या व्यथा : बंद घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

पवार पार्क,चंदू अण्णा नगर परिसरातील नागरिकांच्या व्यथा : बंद घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील आव्हाणे शिवारात गेल्या ८ वर्षांपासून बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पातून निघणाऱ्या कचऱ्याचा धुरामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील चंदू अण्णा नगर, पवार पार्क, निमखेडी परिसर, खोटे नगर परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, हीच समस्या अशाच प्रकारे कायम राहणार असली तर या भागातून घरं विक्री करून पलायन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

मनपा प्रशासनाला अजूनही बंद घनकचरा प्रकल्प सुरु करता आलेला नाही. याठिकाणी पडलेल्या सुमारे १ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर अजूनही प्रक्रिया झालेली नसल्याने, रासायनिक प्रक्रियेमुळे या कचऱ्याला आग लागत आहे. तसेच अनेकवेळा मनपा कर्मचारी या कचऱ्याला आग लावतात. अनेक वर्षांपासून हा कचरा जळत असून, जळणाऱ्या कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.

२४ तास घराचा दरवाजा ठेवावा लागतो बंद

दिवस असो वा रात्र २४ तास या भागात धूर पसरत असतो, त्यामुळे घराचा दरवाजा बंद ठेवावा लागत असल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. त्यात पाऊस झाला तर रस्ते नसल्याने या भागात चिखल पसरतो, तर पाऊस नसला तर सकाळी वाहने वापरत असल्याने रस्त्यावरची सर्व धूळ घरांमध्ये जाते. तर रात्रीच्या वेळेस घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे निघणारा धूर घरांमध्ये जातो. यामुळे घरात थांबणेही कठीण झाले आहे. मनपाकडून रस्त्याचीही दुरुस्ती केली जात नाही. दुसरीकडे धुराबाबत देखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. स्थानिक नगरसेवक व मनपा प्रशासनाकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याचेही रहिवाशांनी सांगितले.

घर विक्री करून गावाकडे परतावे लागेल

काही वर्षांपूर्वी शहरापासून दूर व शांतता असलेला परिसर असल्याने या भागात घर घेतले. मात्र, घर घेतल्यापासून असा एक दिवस नाही गेला की त्या दिवशी धुरापासून आम्हाला त्रास झाला नाही. कोणताही सण असो वा कार्यक्रम अशा परिस्थितीत देखील आम्हाला घर बंद ठेवावे लागते अशी माहिती सुरेखा पाटील या गृहिणीने दिली. या भागात घर घेतल्यानंतर ही समस्या दररोज सहन करावी लागत आहे. आता ही समस्या जर कायम राहिली तर या भागातील सर्वांना ही घरं विक्री करून इतरत्र किंवा पुन्हा गावांमध्ये स्थायिक व्हावे लागेल असा संताप जुई पाटील यांनी व्यक्त केला.

तक्रारी, निवेदन देऊन, आंदोलन करुन थकलो

या भागातील समस्यांबाबत स्थानिक नगरसेवकांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मनपा प्रशासन, महापौर, उपमहापौर, आमदार यांच्यासह पर्यावरणवादी संघटनांना निवेदन देण्यात आले. कोणीच ऐकून घेत नाही. म्हणून कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरून आंदोलन देखील केले. मात्र, कोणत्याही प्रकारचे लक्ष मनपा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी देखील द्यायला तयार नाहीत. सर्वांनी या भागातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले असून, कोणालाही आमच्या समस्यांशी घेणे-देणे नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

कोट..

गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याचा धुरामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. धुरामुळे घराबाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. अनेकदा घरातच धुरामुळे श्वास घ्यायला देखील त्रास होत असतो.

- योगेश पाटील, रहिवासी, पवार पार्क

नागरिक आता कोरोना आला म्हणून मास्क लावत आहेत. मात्र, आमच्या पवार पार्क मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मास्क घालत आहे. कारण, मास्क नाही घातला तर विषारी धुरामुळे आमचे जगणे कठीण होऊन जाईल.

-भूषण जाधव, रहिवासी, चंदू अण्णा नगर परिसर