शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

हैदराबादला जाणवतेय बेअरस्टोची उणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:18 IST

एक असा संघ जो गुणतक्त्यात सर्वात खालच्या स्थानावर आहे. आणि पात्रता फेरी गाठण्याची त्यांच्याकडे संधी नाही. अशा संघाकडे गमावण्यासारखे ...

एक असा संघ जो गुणतक्त्यात सर्वात खालच्या स्थानावर आहे. आणि पात्रता फेरी गाठण्याची त्यांच्याकडे संधी नाही. अशा संघाकडे गमावण्यासारखे काहीही नसते. हैदराबादच्या संघाने या सत्रात खूपच खराब खेळ केला आहे. पंजाबविरोधात १२५ धावांसमोर हैदराबादचा संघ अशा पद्धतीने कमी पडला जसा तो या आधीच्या प्रत्येक सामन्यात होता. डेव्हिड वॉर्नरच्या खराब फॉर्मपेक्षा हैदराबादच्या संघाला जॉनी बेअरस्टोची उणीव भासत आहे. जॉनी संघाला वेगाने सुरुवात करून देत होता. आणि संघात त्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण होत होते.

जेव्हा कोणताही खेळाडू खराब फॉर्ममधून जात असतो. तेव्हा काहीच योग्य होत नसते. अशात तो एक फलंदाज म्हणून बाद होण्याचे विचित्र मार्ग निर्माण करतो.

वॉर्नर यूएईमध्ये पहिल्या सामन्यात बॅटची कड घेऊन जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला होता. पंजाबच्या शमीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर शॉट मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. आशा आहे की तो उरलेल्या सामन्यात चांगली सुरुवात करू शकेल. हैदराबादने त्यासोबतच आक्रमक फलंदाजांऐवजी तांत्रिकदृष्ट्या योग्य फलंदाजांना खेळवायला हवे. तांत्रिक फलंदाज हे हिटरपेक्षा जास्त चांगली सुरुवात करून देऊ शकतात. हिटर एखाद्या सामन्यात चालतात आणि महत्त्वाच्या वेळी चुकीचा फटका मारून बाद होतात.

त्या तुलनेत राजस्थानचा संघ जरा चांगला आहे. मात्र या संघाला खेळात सातत्य ठेवता आले नाही. राजस्थानचे खेळाडू सोशल मीडियावरच जास्त व्हायरल होत आहेत. संजू सॅमसन एक चांगला माणूस आणि कर्णधार आहे. मात्र त्याला खेळाडूंना हे सांगावे लागेल की मैदानावर आनंद व्यक्त करण्याच्या वेगळ्या मार्गापेक्षा क्रिकेटमधील यशाने व्हायरल होणे हे जास्त महत्त्वाचे असते. तीन सर्वोत्तम खेळाडूंची भरपाई करणे कठीण आहे. जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे गेम चेंजर आहेत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत राजस्थानला बिलकुल मदत मिळत नाही. युवा खेळाडूंना हे शिकायला हवे की स्टोक्स मैदानावर त्याचे शंभर टक्के देतो. सध्याच्या काळात तो सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो त्याच्या खेळाप्रति खूपच गंभीर आहे आणि संघाप्रति समर्पित आहे. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून शिकण्याची गरज आहे.

पंजाबच्या विरोधातील कार्तिक त्यागीचे अखेरचे षटक हे चांगले राहिले. मात्र आता तो भूतकाळ झाला. त्याला अशी कामगिरी पुन्हा पुन्हा करावी लागेल. त्यामुळे राजस्थानच्या संघाला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळेल.