शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची तळपून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव, ता. चाळीसगाव : येथील अत्यंत गरिबीत जीवन जगणारा शेतकरी चिला तोताराम माळी यांच्यावर संकटाचा सामना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सायगाव, ता. चाळीसगाव : येथील अत्यंत गरिबीत जीवन जगणारा शेतकरी चिला तोताराम माळी यांच्यावर संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. सायगाव येथे दि. ८ तारखेला झालेल्या घटनेमध्ये राकेश चिला माळी (२०) आणि सुकदेव जगन जाधव (१८) या दोन्ही आतेभाऊ-मामेभाऊ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सायगाव येथील शेतकरी चिला तोताराम माळी यांचा एकुलता एक मुलगा राकेश याचा मृत्यू झाल्याने चिला माळी यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. चिला माळी हा अत्यंत गरीब व सर्वसाधारण. चिला माळी हा जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे. शिक्षण ९वीपर्यंत झालेले आहे. चारही भावंडे विभक्त झाल्याने शेतीची पूर्ण जबाबदारी अपंग असतांना त्यांच्यावर आली आणि ९ वीपर्यंतची शाळा सोडल्यानंतर शेतात आजपर्यंत काबाडकष्ट करून आपल्या संसाराचा गाडा हाकतो आहे.

चिला माळी यांना मुलगा, मुली, पत्नी जनाबाई असा सुखी संसार आहे. एकुलता एक मुलगा राकेश शिकून मोठा झाला. त्याने १२ वीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखा घेऊन पूर्ण केले व पुढे पिलखोड येथीत आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन तो शिक्षण पूर्ण करत होता. चिला माळी व पत्नी जनाबाई हे राकेशचे शिक्षण बघून अत्यंत आनंदी होते. राकेशने एवढे शिक्षण करून आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मदत करू लागला होता. चिला माळी हेदेखील आनंदी होऊन ‘मला जोडबळ मिळाली, आता माझे कष्ट कमी होतील’, असा मनोमन विचार करत असत. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते आणि चिला माळी यांच्यासाठी दि. ८ जुलै एक काळा दिवस ठरला. जे व्हायचे नव्हते तेच झाले आणि राकेश अहिरे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

चिला माळी आणि पत्नी जनाबाईवर सर्वात मोठा आघात झाला आणि कधी न भरणारी पोकळी निर्माण झाली. आपल्या पोटचा गोळा गेल्याने पती-पत्नीने हंबरडा फोडला. मुलगा गेल्याने त्यांचे कष्ट पुन्हा नव्याने सुरू झाले आहेत आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या चिला माळी यांना जावे तर कोणाकडे जावे? असा यक्ष प्रश्न आ वासून उभा आहे.

100721\10jal_11_10072021_12.jpg

 राकेश चिला माळी