शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

हॉटेल व्यवसाय आला ३० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रशासनाने हॉटेल व्यवसाय करण्यास सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मुदत दिली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रशासनाने हॉटेल व्यवसाय करण्यास सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मुदत दिली आहे. खवैय्यांच्या हॉटेल्सला जाण्याच्या वेळेतच नेमकी हॉटेल्स सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या मार्च महिन्याच्या आधी जेवढा व्यवसाय होत होता. त्याच्या ३० टक्केच व्यवसाय आता होत असल्याचे समोर आले आहे.

मार्च २०२०पासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स व्यवसाय बराच काळ बंद होता. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले सर्वचजण हॉटेल मालक, चालक, स्वयंपाकी, वेटर आणि इतर जणांवर बेरोजगारीची परिस्थिती ओढावली होती. मात्र, काही महिन्यात पुन्हा एकदा हॉटेल व्यवसाय सुरू झाला. मधल्या काळात रात्री १० पर्यंत हॉटेल्सला व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हॉटेल व्यवसायाला सकाळी ९ ते रात्री ८ वाजेचे बंधन घालण्यात आले आहे.

काय आहे नेमकी अडचण?

हॉटेल व्यवसायाला खरी सुरूवात सायंकाळी ७.३० नंतर होते. त्यावेळी जेवणासाठी खवैय्ये हॉटेल्सकडे वळतात. मात्र, ८ वाजता हॉटेल बंद करायचे असल्याने ७.४५ वाजेनंतर व्यावसायिक हॉटेल्समध्ये नव्या ग्राहकांना प्रवेश देत नाहीत. सध्या फक्त दुपारी जेवढे ग्राहक जेवायला येतात. तेवढ्याच ग्राहकांवर हॉटेल व्यवसाय टिकून आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये दुपारी हॉटेलमध्ये येणाऱ्यांची संख्यादेखील कमी असते. स्थानिक नागरिक दुपारी हॉटेलकडे वळतच नाहीत. तर एप्रिल आणि मे मध्ये जळगावातील तापमान पाहता बाहेरून येणारे प्रवासीही कमीच असतात. त्यामुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो.

दहा टक्केपेक्षा जास्त हॉटेल्स बंद पडण्याची भीती

या पद्धतीने हॉटेल व्यवसायावर जर निर्बंध येत राहिले तर पुढच्या काही महिन्यातच १० ते १५ टक्के हॉटेल्स बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात ज्यांचा व्यवसाय भाड्याच्या जागेत सुरू आहेत. ते जास्त अडचणीत येऊ शकतात, असे या व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.

आकडेवारी

शहरातील एकूण हॉटेल्स २००

चरितार्थ अवलंबून असणारे - सुमारे अडीच हजार

होणारा व्यवसाय -

मार्च २०२० च्या आधी - दररोज २५ ते ४० लाख रुपये

मार्च २०२१ मध्ये - फक्त चार ते पाच लाख

कोट - हॉटेल व्यवसाय करणारे सध्या अडचणीत आले आहेत. येत्या काही दिवसांत किमान १० टक्के हॉटेल्स बंद होऊ शकतात. कोरोनाच्या काळात आधीच व्यवसाय बंद होता. आता पुन्हा एकदा निर्बंध आले आहेत. - लेखराज उपाध्याय, अध्यक्ष, जळगाव टुरिझम, हॉटेल्स असोसिएशन.