शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

भौतिकतेच्या मागे न धावता मानवी मूल्ये धारण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST

‘‘मनुष्य भौतिकतेच्या मागे लागण्यापेक्षा मानवी मूल्यांचा अंगीकार करेल तर जीवन सुंदर होईल’’ कोरोना महामारीने आपल्याला अनेक धडे शिकविले आहेत. ...

‘‘मनुष्य भौतिकतेच्या मागे लागण्यापेक्षा मानवी मूल्यांचा अंगीकार करेल तर जीवन सुंदर होईल’’ कोरोना महामारीने आपल्याला अनेक धडे शिकविले आहेत. समस्त मानवमात्रांचे दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त करून टाकले. याचा प्रभाव कुणी सकारात्मक तर कुणी नकारात्मक ग्रहण केला. भौतिक दृष्टीने विचार केला तर अनेकांकडे आलिशान घरे, महागड्या गाड्या, भरपूर साधन- संपत्ती होती. परंतु लॉकडाउननंतर सर्व काही एकाच जागेवरच राहिले. त्यामुळे या साधनांचा लाभ घेता आला नाही. पुरातन काळापासून संतांनी हेच समजावले, की आपण भौतिक मायेला इतके अधिक महत्त्व देऊ नये की तेच सर्वस्व आहे. खरंतर ही माया केवळ भ्रम आहे. मायेचा सदुपयोग करून आपण आपल्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. संतांनी नेहमी प्रेम, नम्रता, करुणा, दया यासारख्या मानवी मूल्यांना महत्त्व दिले. लॉकडाउन काळात जेव्हा आपण सर्व घरात होतो, तेव्हा ज्या घरांमध्ये अगोदरपासून प्रेमाचे वातावरण होते. तिथे या परिस्थितीचा नकारात्मक प्रभाव जाणवला नाही. उलट हेच मानले, की नेहमीच्या कामाच्या व्यापात आपण कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हतो, पण या परिस्थितीमध्ये एकमेकांना वेळ देता आला आणि आधीची प्रेमळ नाती आणखी घट्ट झाली. 'विश्व बंधुत्व' आणि 'भिंतीरहीत जग' हा भाव मनामध्ये बाळगून गरजूंना त्या सर्व गोष्टी मागणी करण्यापूर्वीच पोहचविण्याचा प्रयत्न केला ज्यांची गरज होती. या परिस्थितीने हे सिद्ध केले की मानवता हाच खरा धर्म आहे व लॉकडाउनने आमच्या मनाला ही प्रेरणा दिलीकी, आपण एकजुटीने सर्वांना द्यायचे आहे. शेवटी सत्याचा आधार घेऊन जीवनात स्थिरता प्राप्त करावी. आपण जगाशी एकत्वाची भावना प्रस्थापित करावी. आपण खऱ्या अर्थाने मनुष्य आहोत तर मानवतेच्या दिव्य गुणांचा अंगिकार करून प्रेमच करीत जावे, कारण पुढे हाच एकमेव मार्ग आहे.

-संत निरंकारी मंडळ शाखा जळगाव