शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यात रावेर व मुक्ताईनगर या दोन तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने केळी बागा अक्षरश: झोपल्या ...

जळगाव : जिल्ह्यात रावेर व मुक्ताईनगर या दोन तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने केळी बागा अक्षरश: झोपल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शुक्रवारी चोपडा आणि यावलच्या काही भागाला वादळी पावसाने झोडपून काढले. चाळीसगाव येथेही शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यावल तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे दहिगाव, सौखेडा, कोरपावली परिसरात झाडे पडली. दहिगाव, कोरपावली येथील काही घरांचे पत्रे उडाले. काही गावातील वीजपुरवठा खंडित झाला. चाळीसगाव तालुक्यात विशेषत: आडगाव व देवळी परिसरात २८ मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपले. वादळ व पावसाचा जोर इतका प्रचंड

होता की, अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर लिंबू, डाळिंब, शेवग्याची झाडेही मुळासकट कोसळली. वीटभट्टी आणि पशुधनाचेही नुकसान झाले आहे.

देवळी येथे शुक्रवारी विजेची तार पडल्याने बैल जागीच ठार झाला. याच गावातील दादाभाई फकिरा पिंजारी यांच्या पत्र्याच्या घरावरदेखील मेन तार पडला. पण यात मोठा अनर्थ टळला. यात कुटुंबीय बचावले. आडगाव परिसरात वादळामुळे शेतातील घराचे पत्रे उडाल्याने शेतमजूर कुटुंब उघड्यावर आ आहेत.

चौकट

मेंढोळदे ता. मुक्ताईनगर येथे वादळामुळे १८० कुटुंबे उघड्यावर आली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांची जेवणाची व्यवस्था, घर दुरुस्तीसाठी स्वखर्चातून १५ मिस्तरी व मजूर यांनाही बोलावून घेतले व लागलीच कामाला सुरुवात केली. दरम्यान, खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

चाळीसगावला पंचनामे सुरू

चाळीसगाव तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने आडगाव व देवळी येथे नुकसान झाले आहे. या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत, असे नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांनी सांगितले.