शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

जिल्ह्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दररोज काही भागात पावसाची हजेरी लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दररोज काही भागात पावसाची हजेरी लागत आहे. दरम्यान, आगामी पाच दिवस जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. अरबी समुद्रातून उत्तर-पूर्वेकडे जाणाऱ्या वाऱ्यानी दिशा बदलल्यामुळे जिल्ह्यात मान्सून खऱ्याअर्थाने सक्रिय होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात मान्सून वेळेवर दाखल होऊनदेखील पावसाने पाठ फिरवली होती. जून महिन्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस पडला होता, तर जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जुलै महिन्यातील सरासरी भरते की नाही, याबाबत साशंकता होती. जुलै महिन्यात पावसाची सरासरी पाहता, गेल्या दोन वर्षाच्या सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. जुलै २०१९ मध्ये जिल्ह्यात ९० मि.मी., तर २०२० मध्ये ९५ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी जुलै महिन्यात २५ जुलैपर्यंत ११९ मि.मी. पाऊस झाला आहे. तसेच हवामान खात्याने मान्सूनआधी वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात यंदा जून व जुलै महिन्यात पावसाचे मोठे खंड राहून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

मुंबई, कोकणमध्ये पाऊस असताना जळगावात का नाही ? १. जिल्ह्यातील नागरिकांच्या समजाप्रमाणे मुंबईत पाऊस झाला की काही दिवसात जिल्ह्यात देखील पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत जोरदार पाऊस होत असतानाही जिल्ह्यात पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल बनले होते. मुंबईत पाऊस झाल्यानंतर वाऱ्याच्या दिशेनुसारच हा पाऊस होत असतो.

२. यावर्षी अरबी समुद्रातून मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनचे ढग थेट सुरत-वापी मार्गे मध्य प्रदेश व गुजरातमध्ये दाखल झाले. जे ढग नेहमी जळगाव जिल्ह्याकडे येत होते, ते यंदा वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळे मध्य प्रदेशकडे जात होते. मात्र, आता वाऱ्याची दिशा बदलली असून, जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच आगामी पाच दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

९० टक्के पेरणी

जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पेरणी झाली आहे. कापसाच्या अपेक्षित क्षेत्रात १० टक्के घट झाली आहे, तर बाजरी, मक्याच्या क्षेत्रात काही टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतातील पिके देखील चांगल्या प्रकारे तरारली असल्याने शेतकरी आनंदात आहेत.

कोट

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २०० मि.मी. पाऊस झाला असून, सरासरीच्या ५२ टक्के पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबर महिन्यात देखील काही दिवस पावसाचे खंड राहण्याची शक्यता आहे. सरासरीवर मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही. जिल्ह्यात सरासरीपेक्षाही काही टक्के पाऊस चांगला होणार आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ