शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

जिल्ह्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दररोज काही भागात पावसाची हजेरी लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दररोज काही भागात पावसाची हजेरी लागत आहे. दरम्यान, आगामी पाच दिवस जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. अरबी समुद्रातून उत्तर-पूर्वेकडे जाणाऱ्या वाऱ्यानी दिशा बदलल्यामुळे जिल्ह्यात मान्सून खऱ्याअर्थाने सक्रिय होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात मान्सून वेळेवर दाखल होऊनदेखील पावसाने पाठ फिरवली होती. जून महिन्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस पडला होता, तर जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जुलै महिन्यातील सरासरी भरते की नाही, याबाबत साशंकता होती. जुलै महिन्यात पावसाची सरासरी पाहता, गेल्या दोन वर्षाच्या सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. जुलै २०१९ मध्ये जिल्ह्यात ९० मि.मी., तर २०२० मध्ये ९५ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी जुलै महिन्यात २५ जुलैपर्यंत ११९ मि.मी. पाऊस झाला आहे. तसेच हवामान खात्याने मान्सूनआधी वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात यंदा जून व जुलै महिन्यात पावसाचे मोठे खंड राहून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

मुंबई, कोकणमध्ये पाऊस असताना जळगावात का नाही ? १. जिल्ह्यातील नागरिकांच्या समजाप्रमाणे मुंबईत पाऊस झाला की काही दिवसात जिल्ह्यात देखील पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत जोरदार पाऊस होत असतानाही जिल्ह्यात पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल बनले होते. मुंबईत पाऊस झाल्यानंतर वाऱ्याच्या दिशेनुसारच हा पाऊस होत असतो.

२. यावर्षी अरबी समुद्रातून मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनचे ढग थेट सुरत-वापी मार्गे मध्य प्रदेश व गुजरातमध्ये दाखल झाले. जे ढग नेहमी जळगाव जिल्ह्याकडे येत होते, ते यंदा वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळे मध्य प्रदेशकडे जात होते. मात्र, आता वाऱ्याची दिशा बदलली असून, जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच आगामी पाच दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

९० टक्के पेरणी

जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पेरणी झाली आहे. कापसाच्या अपेक्षित क्षेत्रात १० टक्के घट झाली आहे, तर बाजरी, मक्याच्या क्षेत्रात काही टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतातील पिके देखील चांगल्या प्रकारे तरारली असल्याने शेतकरी आनंदात आहेत.

कोट

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २०० मि.मी. पाऊस झाला असून, सरासरीच्या ५२ टक्के पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबर महिन्यात देखील काही दिवस पावसाचे खंड राहण्याची शक्यता आहे. सरासरीवर मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही. जिल्ह्यात सरासरीपेक्षाही काही टक्के पाऊस चांगला होणार आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ