शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

जिल्ह्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दररोज काही भागात पावसाची हजेरी लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दररोज काही भागात पावसाची हजेरी लागत आहे. दरम्यान, आगामी पाच दिवस जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. अरबी समुद्रातून उत्तर-पूर्वेकडे जाणाऱ्या वाऱ्यानी दिशा बदलल्यामुळे जिल्ह्यात मान्सून खऱ्याअर्थाने सक्रिय होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात मान्सून वेळेवर दाखल होऊनदेखील पावसाने पाठ फिरवली होती. जून महिन्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस पडला होता, तर जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जुलै महिन्यातील सरासरी भरते की नाही, याबाबत साशंकता होती. जुलै महिन्यात पावसाची सरासरी पाहता, गेल्या दोन वर्षाच्या सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. जुलै २०१९ मध्ये जिल्ह्यात ९० मि.मी., तर २०२० मध्ये ९५ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी जुलै महिन्यात २५ जुलैपर्यंत ११९ मि.मी. पाऊस झाला आहे. तसेच हवामान खात्याने मान्सूनआधी वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात यंदा जून व जुलै महिन्यात पावसाचे मोठे खंड राहून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

मुंबई, कोकणमध्ये पाऊस असताना जळगावात का नाही ? १. जिल्ह्यातील नागरिकांच्या समजाप्रमाणे मुंबईत पाऊस झाला की काही दिवसात जिल्ह्यात देखील पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत जोरदार पाऊस होत असतानाही जिल्ह्यात पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल बनले होते. मुंबईत पाऊस झाल्यानंतर वाऱ्याच्या दिशेनुसारच हा पाऊस होत असतो.

२. यावर्षी अरबी समुद्रातून मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनचे ढग थेट सुरत-वापी मार्गे मध्य प्रदेश व गुजरातमध्ये दाखल झाले. जे ढग नेहमी जळगाव जिल्ह्याकडे येत होते, ते यंदा वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळे मध्य प्रदेशकडे जात होते. मात्र, आता वाऱ्याची दिशा बदलली असून, जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच आगामी पाच दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

९० टक्के पेरणी

जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पेरणी झाली आहे. कापसाच्या अपेक्षित क्षेत्रात १० टक्के घट झाली आहे, तर बाजरी, मक्याच्या क्षेत्रात काही टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतातील पिके देखील चांगल्या प्रकारे तरारली असल्याने शेतकरी आनंदात आहेत.

कोट

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २०० मि.मी. पाऊस झाला असून, सरासरीच्या ५२ टक्के पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबर महिन्यात देखील काही दिवस पावसाचे खंड राहण्याची शक्यता आहे. सरासरीवर मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही. जिल्ह्यात सरासरीपेक्षाही काही टक्के पाऊस चांगला होणार आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ