शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

शिक्षकांच्या कोरोना चाचणीसाठी आरोग्य विभागाच्या ‘एनओसी’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST

जळगाव : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास सोमवारी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. नववी ते ...

जळगाव : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास सोमवारी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्याच सूचनांचे पालन करण्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे. मात्र, अद्याप शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासंदर्भात कुठलीही सूचना नसल्यामुळे जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. ए. अकलाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जळगाव जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या १ हजार ९२८ शाळा आहेत़. या शाळांमध्ये ३ लाख १० हजार २०१ विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना २० हजार ५४४ शिक्षक अध्यापन करतात. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने मार्च महिन्यापासून थैमान घातल्यामुळे शाळा बंद होत्या. डिसेंबर महिन्यात प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. आता पुढील टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे़. त्यामुळे नववी ते बारावीचे वर्ग सुरू करताना ज्या सूचना करण्यात आल्या होत्या, त्या सूचनांचे पालन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करताना करावे, असे शासनाने कळविले आहे. दरम्यान, सात ते आठ दिवसांत शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे २० हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी व आरोग्य विभागाशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येणार आहे.

१ कोटी ६१ लाखांचा निधी प्राप्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये आवश्यक सुविधा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये या सुविधा असाव्यात म्हणून पूर्वतयारीसाठी अर्थात सॅनिटायझर व इतर वस्तूंसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी शिक्षण विभागाला उपलब्ध झाला आहे. तो शाळांना वर्ग केला जाणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे शाळांना बंधनकारक असेल. पूर्वतयारीसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तो निधी जिल्हा परिषद शाळांना पाठविण्यात येणार आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचणीसंदर्भात जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाशी चर्चा करू.

- बी. ए. अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग

--------------------

जिल्ह्यातील शाळांची संख्या

- १९२८

----------------

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

- ३,१०,२०१

-------------------

जिल्ह्यातील शिक्षक

- २०५५४