शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या कोरोना चाचणीसाठी आरोग्य विभागाच्या ‘एनओसी’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST

जळगाव : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास सोमवारी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. नववी ते ...

जळगाव : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास सोमवारी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्याच सूचनांचे पालन करण्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे. मात्र, अद्याप शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासंदर्भात कुठलीही सूचना नसल्यामुळे जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. ए. अकलाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जळगाव जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या १ हजार ९२८ शाळा आहेत़. या शाळांमध्ये ३ लाख १० हजार २०१ विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना २० हजार ५४४ शिक्षक अध्यापन करतात. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने मार्च महिन्यापासून थैमान घातल्यामुळे शाळा बंद होत्या. डिसेंबर महिन्यात प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. आता पुढील टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे़. त्यामुळे नववी ते बारावीचे वर्ग सुरू करताना ज्या सूचना करण्यात आल्या होत्या, त्या सूचनांचे पालन पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करताना करावे, असे शासनाने कळविले आहे. दरम्यान, सात ते आठ दिवसांत शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे २० हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी व आरोग्य विभागाशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येणार आहे.

१ कोटी ६१ लाखांचा निधी प्राप्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये आवश्यक सुविधा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये या सुविधा असाव्यात म्हणून पूर्वतयारीसाठी अर्थात सॅनिटायझर व इतर वस्तूंसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी शिक्षण विभागाला उपलब्ध झाला आहे. तो शाळांना वर्ग केला जाणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे शाळांना बंधनकारक असेल. पूर्वतयारीसाठी १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तो निधी जिल्हा परिषद शाळांना पाठविण्यात येणार आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचणीसंदर्भात जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाशी चर्चा करू.

- बी. ए. अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग

--------------------

जिल्ह्यातील शाळांची संख्या

- १९२८

----------------

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

- ३,१०,२०१

-------------------

जिल्ह्यातील शिक्षक

- २०५५४