शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

आरोग्य विभाग आता बदल्यांमुळे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रिया यंदाही आरोग्य विभागाच्या बदल्यांवरून झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रिया यंदाही आरोग्य विभागाच्या बदल्यांवरून झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. काही कर्मचाऱ्यांनी माध्यमांना या बदल्यांबाबत भेदभाव झाल्याचा तसेच पदाधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने या बदल्या झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेला आरोग्य विभाग आता बदल्यांमुळे चर्चेत आला आहे.

आरोग्य विभागातील पदोन्नतीचा विषय अद्यापही मार्गी लागलेला नसून मनुष्यबळाचा मुद्दा उपस्थित करून विभागाकडून वेळ मारून नेली जात आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून विविध सभांमध्ये गाजणारा हा मुद्दा मार्गीच लागत नसल्याने यंत्रणा नेमकी करतेय काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोग्य विभाग अशक्तपणे काम करीत असेल तर आरोग्य यंत्रणा मजबूत होणार कशी, असाही प्रश्न विचारला जात आहे. विविध मुद्द्यांवरून सभांमध्ये नेहमी आरेाग्य विभागच चर्चेत राहत असल्याने वरिष्ठांपुढे आता करायचे काय? हा पेच निर्माण झाला आहे. त्यातच शनिवारी आरोग्य विभागातील ४९ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात जळगावात बदलीसाठी काही आरोग्य सेविका रडल्याची माहिती आहे. मात्र, दोनच जागा रिक्त असल्याने त्यात दिव्यांग तसेच अत्यंत गरजेच्या कर्मचाऱ्यांना संधी दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. समुपदेशनाने या बदल्या होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी यात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपावर कर्मचाऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गंभीर बाब म्हणजे पदाधिकारी व सदस्यांना विचारून बदल्या होत असल्याचा आरोपही काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. बदल्यांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार नसून दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्राधान्याने बदली देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिले आहे.

अशा झाल्या एकूण बदल्या

प्रशासकीय ३१

विनंती १६०

आपसी ४

तीन दिवस तालुकास्तरावर बदल्या

कोरोनामुळे जून महिन्यात रद्द करण्यात आलेली बदली प्रक्रिया जुलै महिन्यात राबविण्यात आली. यासाठी जिल्हा परिषद स्तरावरील बदल्यांसाठी विभागानुसार २३ व २४ जुलैला समुपदेशन घेण्यात आले. २७ ते ३१ जुलैपर्यंत आता तालुकास्तरावर बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.