शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

त्यांनी बागायती क्षेत्र घटविले अन् गावासाठी औदार्य दाखविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST

कळमसरे, ता. अमळनेर : दानशूरपणा एकीकडे कमी होऊ लागला आहे, तर शेतकरी आत्महत्या करू लागला आहे; पण असा एक ...

कळमसरे, ता. अमळनेर : दानशूरपणा एकीकडे कमी होऊ लागला आहे, तर शेतकरी आत्महत्या करू लागला आहे; पण असा एक शेतकरी आहे की, ज्याने बागायती क्षेत्र कमी करून गावासाठी पाणी वाटपाचा विडा उचलला आहे.

येथून जवळच असलेल्या वासरे गावाचे शेतकरी राजेंद्र शेणपडू पाटील यांनी स्वत:चे बागायती क्षेत्र घटवून शेतातील विहिरीचे पाणी टँकरद्वारे दररोज गावाला मोफत पुरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना याकामी कळमसरेचे रामदेव शर्मा यांनी टँकर विनामूल्य वापरासाठी उपलब्ध करून दिलेले आहे.

एकेकाळी तीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या वासरे ग्रामस्थांनी दोन वर्षापूर्वी पाडळसे धरणकामासाठी गौण खनिज पुरवून त्या मोबदल्यात गावी पाझर तलाव, नाला खोलीकरण, आदी जलसंधारणाची कामे करवून घेतल्याने गाव टँकरमुक्त झाले; परंतु क्षारअंश पाण्यामुळे पाणी पिण्यास बेचव जाणवू लागले. राजेंद्र पाटील यांचे सात भावांचे सहकार्य करणारे कुटुंब गावासाठी पुढे सरसावले. भावाभावांमध्ये आपापसात विचार-विनिमयाने राजेंद्र पाटील यांनी दरवर्षीपेक्षा यावर्षी एकूण क्षेत्रात बागायती पेरा कमी करून विहिरीचे शुद्ध पाणी पिण्यासाठी गावाला मोफत उपलब्ध करून दिले आहे.

ग्रामपंचायतीने केला अभिनंदनाचा ठराव

त्यांच्या या उपक्रमाचे सरपंच आशा भटू पाटील यांनी ग्रा. पं. ठरावाद्वारे अभिनंदन केले आहे. दोन महिन्यांपासून पाऊस नाही, जनावरांना चारा नाही. शेतकरी हवालदिल झालेला असताना राजेंद्र पाटील यांनी हमीचे बागायती क्षेत्र कमी पेरा करून, विहिरीचे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत पुरवीत आहेत. हा त्यांचा गावासाठीचा त्याग आम्ही कधीही विसरणार नसल्याचे सरपंच आशाबाई पाटील, माजी सरपंच प्रवीण दयाराम पाटील, पांडुरंग रूपचंद पाटील, पोलीस पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

120821\12jal_5_12082021_12.jpg

वासरे येथे राजेंद्र शेणपडू पाटील हे टँकरद्वारे पिण्याचे पाणी वाटप करताना.