शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रेल्वे स्टेशन समोर पुन्हा हातगाड्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST

जळगाव : गेल्या आठवड्यात मनपाने रेल्वे स्टेशन समोरील खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांचे अतिक्रमण हटविल्यानंतरही, आठवडाभरात पुन्हा या ठिकाणी जैसे थे ...

जळगाव : गेल्या आठवड्यात मनपाने रेल्वे स्टेशन समोरील खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांचे अतिक्रमण हटविल्यानंतरही, आठवडाभरात पुन्हा या ठिकाणी जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पोलीस चौकीच्या दोन्ही बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पर्यंत दररोज वाहतूक कोंडी उद्भवत आहे.

सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या जळगाव रेल्वे स्टेशनसमोर अतिक्रमणामुळे अनेक वादाचे प्रकार घडले आहेत. जागोजागी लागलेल्या रिक्षा अन् इतर दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे दररोज या ठिकाणी वाहतूक जाम होत आहे. असे असतांना त्यात स्टेशनसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूने खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे, या कोंडीत अधिकच भर पडत आहे. गेल्याच आठवड्यात मनपा अतिक्रमण विभागाने केेलेल्या कारवाईत, अनेक विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त केल्या होत्या. यामुळे कोंडीची समस्या मिटून, परिसराने मोकळा श्वास घेतला होता.मात्र, आठवडाभरानंतर पुन्हा या ठिकाणी हातगाड्यांनी अतिक्रमण केले आहे.

इन्फो :

कारवाईत सातत्य नसल्याने, विक्रेत्यांचे फावले

मनपातर्फे महिना, दोन महिन्यातून स्टेशन समोरील विक्रेत्यांवर कारवाई सुरूच असते. मात्र, या कारवाईत सातत्यता राहत नाही. कारवाई केल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच दिवशी हातगाड्या थाटतात. मनपाचे पथक आल्यावर, अवघ्या दहा मिनिटात एखादी हातगाडी जप्त करुन निघून जाते. नंतर मात्र येत नाही. अशा प्रकारे मनपातर्फे कारवाईत सातत्याचा अभाव आणि थातूरमातूर कारवाई होत असल्यामुळे विक्रेत्यांचे फावले असल्याचे नेहमी ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.