शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

पालकमंत्र्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे, मात्र टीका केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या प्रश्नासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत भाजपने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या प्रश्नासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत भाजपने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला हे निकष पुन्हा बदलवावे लागले. यामध्ये कुणीही श्रेय घेत नसून, शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही मांडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे माझ्या वडिलांसारखे असून, त्यांनी या मुद्द्यावर मी चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज होती; मात्र त्यांनी टीका केली, असे सांगत खासदार रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

गुरुवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर २६ रोजी भाजपच्या होत असलेल्या आंदोलनाबाबत खासदार रक्षा खडसे यांची पत्रकार परिषद ब्राह्मण सभेत पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, केळी पीक विम्याचे निकष हे राज्य शासनाने बदलविले होते; मात्र त्यावेळीही शिवसेना व इतर पक्षातील नेत्यांनी केंद्रावर खापर फोडले. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाला माघार घ्यावी लागली व पुन्हा जुने निकष लागू केले. आता सेनेच्या नेत्यांकडून हे जुने निकष पुन्हा राज्य शासनाने आणले, असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र जेव्हा निकष हटविले जातात तेव्हा केंद्र शासन जबाबदार आणि हेच निकष पुन्हा आणले जातात तेव्हा राज्य शासनाने केले असल्याचे सांगितले जाते; मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण माहिती असून, हे निकष बदलविण्यासाठी कोणी प्रयत्न केले. त्यामुळे कोणी कितीही श्रेय घेतले तरी काहीही फायदा नाही, असे रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.