शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

पालकमंत्र्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे, मात्र टीका केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या प्रश्नासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत भाजपने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या प्रश्नासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत भाजपने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला हे निकष पुन्हा बदलवावे लागले. यामध्ये कुणीही श्रेय घेत नसून, शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही मांडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे माझ्या वडिलांसारखे असून, त्यांनी या मुद्द्यावर मी चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज होती; मात्र त्यांनी टीका केली, असे सांगत खासदार रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

गुरुवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर २६ रोजी भाजपच्या होत असलेल्या आंदोलनाबाबत खासदार रक्षा खडसे यांची पत्रकार परिषद ब्राह्मण सभेत पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, केळी पीक विम्याचे निकष हे राज्य शासनाने बदलविले होते; मात्र त्यावेळीही शिवसेना व इतर पक्षातील नेत्यांनी केंद्रावर खापर फोडले. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाला माघार घ्यावी लागली व पुन्हा जुने निकष लागू केले. आता सेनेच्या नेत्यांकडून हे जुने निकष पुन्हा राज्य शासनाने आणले, असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र जेव्हा निकष हटविले जातात तेव्हा केंद्र शासन जबाबदार आणि हेच निकष पुन्हा आणले जातात तेव्हा राज्य शासनाने केले असल्याचे सांगितले जाते; मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण माहिती असून, हे निकष बदलविण्यासाठी कोणी प्रयत्न केले. त्यामुळे कोणी कितीही श्रेय घेतले तरी काहीही फायदा नाही, असे रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.