शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

पालकमंत्री पाटलांचे आरोप म्हणजे, नाचता येईना अंगण वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या दीड वर्षात बैठका घेण्याशिवाय कुठलेही ठोस काम केले नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या दीड वर्षात बैठका घेण्याशिवाय कुठलेही ठोस काम केले नाही. असे असताना त्यांनी भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असा प्रकार असल्याचा पलटवार भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सोमवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

भाजपचे जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे सोमवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत भाजप मनपा गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी व मनोज भांडारकर उपस्थित होते. रविवारी शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या काळात कुठलेही कामे न करता जळगाव शहराची वाट लावल्याचा आरोप केला होता. त्यावरून आज भाजप पदाधिकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी महापालिकेला भाजपच्या काळात मिळालेल्या १०० कोटींच्या निधीवरील स्थगिती उठवून दाखवावी, असे आव्हान दिले.

पालकमंत्र्यांनी बैठका घेण्याशिवाय दुसरे काय काम केले ?

यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिकेत व राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवरील सुमारे ४५० कोटींच्या कर्जाचा प्रश्न मार्गी लावून पालिका कर्जमुक्त केली. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडून २५ कोटी त्यानंतर महापालिकेत भाजपची सत्ता येताच १०० कोटींचा निधी आणला. त्यातील ४१ कोटींच्या कामांच्या निविदाही निघाल्यात. मात्र, राज्यात शिवसेनेने सत्ता येताच या निधीला स्थगिती दिल्याने विकास खुटल्याचा आरोपदेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. कोरोना काळात काम करण्याची संधी असताना गुलाबराव पाटील यांनी केवळ बैठका घेण्याशिवाय दुसरे काय केले ? असा सवालदेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. शहराच्या विकासासाठी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्याच सरकारने ४१ कोटींच्या कामाला जी स्थगिती दिली आहे, ती सात दिवसांत उठवून दाखवावी तसेच ५८ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी आणावी व आणखी १०० कोटींचा निधी शासनाकडून आणून दाखवावा, असे आव्हानदेखील यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले.