शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पाटलांचे आरोप म्हणजे, नाचता येईना अंगण वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या दीड वर्षात बैठका घेण्याशिवाय कुठलेही ठोस काम केले नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या दीड वर्षात बैठका घेण्याशिवाय कुठलेही ठोस काम केले नाही. असे असताना त्यांनी भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असा प्रकार असल्याचा पलटवार भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सोमवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

भाजपचे जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे सोमवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत भाजप मनपा गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी व मनोज भांडारकर उपस्थित होते. रविवारी शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या काळात कुठलेही कामे न करता जळगाव शहराची वाट लावल्याचा आरोप केला होता. त्यावरून आज भाजप पदाधिकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी महापालिकेला भाजपच्या काळात मिळालेल्या १०० कोटींच्या निधीवरील स्थगिती उठवून दाखवावी, असे आव्हान दिले.

पालकमंत्र्यांनी बैठका घेण्याशिवाय दुसरे काय काम केले ?

यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिकेत व राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवरील सुमारे ४५० कोटींच्या कर्जाचा प्रश्न मार्गी लावून पालिका कर्जमुक्त केली. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडून २५ कोटी त्यानंतर महापालिकेत भाजपची सत्ता येताच १०० कोटींचा निधी आणला. त्यातील ४१ कोटींच्या कामांच्या निविदाही निघाल्यात. मात्र, राज्यात शिवसेनेने सत्ता येताच या निधीला स्थगिती दिल्याने विकास खुटल्याचा आरोपदेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. कोरोना काळात काम करण्याची संधी असताना गुलाबराव पाटील यांनी केवळ बैठका घेण्याशिवाय दुसरे काय केले ? असा सवालदेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. शहराच्या विकासासाठी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्याच सरकारने ४१ कोटींच्या कामाला जी स्थगिती दिली आहे, ती सात दिवसांत उठवून दाखवावी तसेच ५८ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी आणावी व आणखी १०० कोटींचा निधी शासनाकडून आणून दाखवावा, असे आव्हानदेखील यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले.